शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४
कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर
कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर
पुण्यामध्ये जन्म झालेला असला, तरी त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले. बी.ए. झाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन, छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. नंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
सामाजिक अन्याय व विषमता यांवर त्यांच्या लेखणीने कठोर प्रहार केला. ‘साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे’, या मताचे ते पुरस्कर्ते होते आणि ते त्यांनी आपल्या कृतीतून व लेखनातून वारंवार प्रकट केले. १९३२ साली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य केले.
जीवनलहरी (१९३३) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती, वादळवेल, मुक्तायन, पाथेय (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४), वादळवेल (१९६९), मारवा (१९९९) असे त्यांचे एकाहून एक सरस असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. तर दुसरा पेशवा (१९४७), वैजयंती, राजमुकूट, कौंतेय, आमचं नाव बाबुराव, ययाति आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट ही नाटके त्यांनी लिहिली. ‘नटसम्राट’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘नटसम्राट’ मधील मध्यवर्ती भूमिका करण्यात आजही मराठी नाट्यसृष्टीतील कलावंत धन्यता मानतात. ती भूमिका आव्हानात्मक मानली जाते.
वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर अशा कादंबर्या, तर फुलवाली, काही वृद्ध काही तरुण, प्रेम आणि मांजर, बारा निवडक कथा असे त्यांचे काही कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. समिधा हा मुक्तकाव्यसंग्रह , तसेच ‘आहे आणि नाही’, विरामचिन्हे, वाटेवरच्या सावल्या, प्रतिसाद हे ललित लेखसंग्रह अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे.
‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ (कोलंबसाचे गर्वगीत) किंवा ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ असे ओजस्वी, तेजस्वी शब्द वापरून त्यांनी मनामनात जसा क्रांती-जोष भरला, तसाच पृथ्वीचे प्रेमगीत, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात... अशी विलक्षण हळुवार, तरल कविता लिहून प्रेमाचा संदेश मराठी मनामनापर्यंत पोहोचवला. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या कवितेतून त्यांनी अक्षरश: इतिहासही जिवंत केला. पुढे ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ लिहून भारतमातेची व्यथा जनतेसमोर मांडली, लोकांच्या डोळ्यात अंजन घातले.
केशवसुत, मर्ढेकर, गोविंदाग्रज, सावरकर, रविकिरण मंडळातील कवी... आदी कवींचा प्रभाव कुसुमाग्रजांवर होता. तो प्रभाव, तो संस्कार घेऊन त्यांनी पुढे स्वत:ची एक काव्यधारा निर्माण केली. सामाजिक कविता, देशभक्तीपर कविता, प्रेम-विरहपर कविता, ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन करणार्या कविता, आध्यात्मिक आशायाच्या कविता, निसर्गकविता असे सर्व कविताप्रकार त्यांनी लीलया हाताळलेले दिसतात.
त्यांच्या ‘विशाखा’ ह्या काव्यसंग्रहावर मराठी रसिकांनी मनापासून प्रेम केले. ऐन स्वातंत्र्यलढ्यात (१९३० ते १९४०) या संग्रहातील कविता त्यांनी लिहिल्या होत्या. अक्षरश: पूर्ण काव्यसंग्रह पाठ असणारे अनेक रसिक आजही सापडतील, अशी त्यांच्या विलक्षण प्रतिभेची आणि लोकप्रियतेची किमया आहे. घाटबंद-रेखीव-प्रमाणबद्ध रचना, कल्पनावैभव, उत्कटता, चिंतनशीलता, राष्ट्रीयता, समाजाभिमुखता ही त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. त्यांच्या या लेखनसेवेचा यथोचित गौरव ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७-८८) देऊन करण्यात आला. हा साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक होत.
इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. ‘तात्यासाहेब’म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असणार्या कुसुमाग्रजांनी मुंबई येथे योजलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्षपद भूषवले. त्या आधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (१९६४,गोवा) आणि नाट्य संमेलनाचे(१९७०,कोल्हापूर) अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. सन २००३मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने कुसुमाग्रजांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिटाचे अनावरण केले. असा बहुमान मिळवणारे ते पहिलेच मराठी साहित्यिक होत. जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठीवर प्रेम करणार्या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रजांच्या रूपाने मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा मानदंड महाराष्ट्राला लाभला असे मानले जाते ते उचितच आहे.
केशवसुत, मर्ढेकर, गोविंदाग्रज आदी
प्रवर्तक कवींच्या परंपरेचा वारसा चालवून, पुढे स्वत:चे अस्तित्व व
श्रेष्ठत्व सिद्ध करून एक स्वतंत्र काव्य-प्रवाह निर्माण करणारे कवी!
एक श्रेष्ठ कवी म्हणून कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर जेवढे लोकप्रिय
होते, तेवढेच ते नाटककार म्हणूनही लोकप्रिय होते. कविता, नाटक, कादंबरी,
कथा, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळून त्या सार्या
प्रांतांत आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे एक उच्च प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणजे
कुसुमाग्रज होत. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु
त्यांचे काका -वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव
विष्णू वामन शिवाडकर असे झाले.पुण्यामध्ये जन्म झालेला असला, तरी त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले. बी.ए. झाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन, छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. नंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
सामाजिक अन्याय व विषमता यांवर त्यांच्या लेखणीने कठोर प्रहार केला. ‘साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे’, या मताचे ते पुरस्कर्ते होते आणि ते त्यांनी आपल्या कृतीतून व लेखनातून वारंवार प्रकट केले. १९३२ साली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य केले.
जीवनलहरी (१९३३) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती, वादळवेल, मुक्तायन, पाथेय (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४), वादळवेल (१९६९), मारवा (१९९९) असे त्यांचे एकाहून एक सरस असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. तर दुसरा पेशवा (१९४७), वैजयंती, राजमुकूट, कौंतेय, आमचं नाव बाबुराव, ययाति आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट ही नाटके त्यांनी लिहिली. ‘नटसम्राट’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘नटसम्राट’ मधील मध्यवर्ती भूमिका करण्यात आजही मराठी नाट्यसृष्टीतील कलावंत धन्यता मानतात. ती भूमिका आव्हानात्मक मानली जाते.
वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर अशा कादंबर्या, तर फुलवाली, काही वृद्ध काही तरुण, प्रेम आणि मांजर, बारा निवडक कथा असे त्यांचे काही कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. समिधा हा मुक्तकाव्यसंग्रह , तसेच ‘आहे आणि नाही’, विरामचिन्हे, वाटेवरच्या सावल्या, प्रतिसाद हे ललित लेखसंग्रह अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे.
‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ (कोलंबसाचे गर्वगीत) किंवा ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ असे ओजस्वी, तेजस्वी शब्द वापरून त्यांनी मनामनात जसा क्रांती-जोष भरला, तसाच पृथ्वीचे प्रेमगीत, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात... अशी विलक्षण हळुवार, तरल कविता लिहून प्रेमाचा संदेश मराठी मनामनापर्यंत पोहोचवला. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या कवितेतून त्यांनी अक्षरश: इतिहासही जिवंत केला. पुढे ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ लिहून भारतमातेची व्यथा जनतेसमोर मांडली, लोकांच्या डोळ्यात अंजन घातले.
केशवसुत, मर्ढेकर, गोविंदाग्रज, सावरकर, रविकिरण मंडळातील कवी... आदी कवींचा प्रभाव कुसुमाग्रजांवर होता. तो प्रभाव, तो संस्कार घेऊन त्यांनी पुढे स्वत:ची एक काव्यधारा निर्माण केली. सामाजिक कविता, देशभक्तीपर कविता, प्रेम-विरहपर कविता, ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन करणार्या कविता, आध्यात्मिक आशायाच्या कविता, निसर्गकविता असे सर्व कविताप्रकार त्यांनी लीलया हाताळलेले दिसतात.
त्यांच्या ‘विशाखा’ ह्या काव्यसंग्रहावर मराठी रसिकांनी मनापासून प्रेम केले. ऐन स्वातंत्र्यलढ्यात (१९३० ते १९४०) या संग्रहातील कविता त्यांनी लिहिल्या होत्या. अक्षरश: पूर्ण काव्यसंग्रह पाठ असणारे अनेक रसिक आजही सापडतील, अशी त्यांच्या विलक्षण प्रतिभेची आणि लोकप्रियतेची किमया आहे. घाटबंद-रेखीव-प्रमाणबद्ध रचना, कल्पनावैभव, उत्कटता, चिंतनशीलता, राष्ट्रीयता, समाजाभिमुखता ही त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. त्यांच्या या लेखनसेवेचा यथोचित गौरव ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७-८८) देऊन करण्यात आला. हा साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक होत.
इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. ‘तात्यासाहेब’म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असणार्या कुसुमाग्रजांनी मुंबई येथे योजलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्षपद भूषवले. त्या आधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (१९६४,गोवा) आणि नाट्य संमेलनाचे(१९७०,कोल्हापूर) अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. सन २००३मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने कुसुमाग्रजांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिटाचे अनावरण केले. असा बहुमान मिळवणारे ते पहिलेच मराठी साहित्यिक होत. जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठीवर प्रेम करणार्या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रजांच्या रूपाने मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा मानदंड महाराष्ट्राला लाभला असे मानले जाते ते उचितच आहे.
शांता शेळके
शांता शेळके
ज्यांचं साहित्यही व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच स्वच्छ, निर्मळ, नितळ, प्रसन्न, स्निग्ध, आनंददायी व शालीन आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक!
मराठी साहित्यातील रसिकप्रिय कवयित्री ! गीतकार, कथालेखिका, कादंबरीकार, अनुवादक, ललितलेखिका, बालवाङ्मयकार, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका अशा वेगवेगळ्या साहित्यिक भूमिकांवरही हुकूमत असणार्या बहुश्रुत साहित्यिक म्हणजे शांता जनार्दन शेळके होत.
यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर या गावचा. बालपण याच जिल्ह्यातील खेड, मंचर या परिसरात गेले. शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षणही पुण्यात (स. प. महाविद्यालयात) झाले. कोष्टी समाजातील पहिली एम. ए. महिला अशीही त्यांची वेगळी ओळख. श्री. म. माटे, रा. श्री. जोग, प्र. के. अत्रे यांच्यासारख्या दिग्गजांमुळे साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्या मनावर झाले. अत्रे यांच्या साप्ताहिक नवयुग व दैनिक मराठामध्ये त्यांनी काही काळ काम केले. मुंबईच्या रुईया, महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापनही केले.
मराठी साहित्यामधे त्यांनी विपुल लेखन केले आहे. सुमारे १०० पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. वेगवेगळे वाङ्मयप्रकार हाताळले, तरीही त्या त्यांच्या कविता व गीतांमुळेच जनमानसात घर करून आहेत. नवकवींच्या कवितांविषयी आत्मीयता बाळगणार्या रसिक श्रोत्या व मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे मराठी साहित्यात एक वेगळे स्थान आहे. उत्कृष्ट वक्तृत्व हा आणखी एक गुणविशेष त्यांच्या अंगी होता. आळंदी येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून केलेल्या ओघवत्या शैलीतील, रसाळ भाषणाचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी घेतला.
मोठा गोल चेहरा, भव्य भालप्रदेशावर ठळक कुंकू, चष्मा, डोक्यावरून पदर, बोलण्यात अदब, स्निग्धता आणि मार्दव. या अशा व्यक्तिमत्त्वातून त्यांच्यातला खानदानीपणा दिसून येई. त्यांचा व्यासंग, बुद्धिमत्ता व अफाट स्मरणशक्ती यांमुळे रसिक श्रोते त्यांच्या वक्तव्यात गुंगून जात. जुन्या काळच्या संतकवींपासून ते आधुनिक कवींपर्यंत आवडलेल्या सर्व कविता त्यांना तोंडपाठ असत. अभिजात पौर्वात्य व पाश्र्चिमात्य साहित्याची बहुश्रुतता, भाषेतील सहजलालित्य आणि आत्माविष्काराची उर्मी यांमुळे त्यांचे लेखन वाचकांच्या मनाची पकड घेणारे ठरले. भोवतीच्या सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन स्थित्यंतराचे अंतर्गत पडसाद त्यांच्या लेखनातून परावर्तीत होत राहिले, तसेच त्यांची मूळची सौंदर्यवादी वृत्तीही तशीच टिकून राहिली.
ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट व भावानुकूल भावगीते व चित्रपटगीते त्यांनी लिहिली. सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतकार म्हणून भूमिका निभावली. तोच चंद्रमा नभात, मी डोलकर डोलकर, जीवलगा राहिले रे दूर घर, गणराज रंगी, मागे उभा मंगेश, रेशमांच्या रेघांनी, ही वाट दूर जाते, वादळ वारं सुटलं ग ... अशा कितीतरी अविस्मरणीय गीतांनी मराठी मनाला त्यांनी गुंगवून ठेवले. वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होय. त्यानंतर रूपसी (१९५६), गोंदण(१९७५), अनोळख (१९८६), जन्मजान्हवी (१९९०), तोच चंद्रमा (१९७६), कळ्यांचे दिवस फुलांच्या राती (१९८६), इत्यर्थ असे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कथा, ललित लेखसंग्रह, कादंबर्या यांबरोबरच जपानी कवींच्या हायकूंचे भावांतर (पाण्यावरच्या पाकळ्या), कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद अशी साहित्यनिर्मिती त्यांनी केली. शांता शेळके यांची संपादन क्षेत्रातील कामगिरीही मोठी आहे. गदिमांच्या गीतांचे संकलन, कुसुमाग्रजांच्या कथांचे व कवितांचे संपादन, पु. ल. देशपांडे यांच्या विविध भाषणांचे ‘रसिक हो!’ व ‘श्रोते हो!’ या ग्रंथांच्या माध्यमातून संपादन आणि विविध साहित्यकृतींसाठी प्रस्तावना लेखन - हे शांताबाईंचे कार्य म्हणजे मराठी साहित्यातील अनमोल योगदान आहे.
१९९६ मध्ये आळंदी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. चिमणचारा, गोंदण या त्यांच्या पुस्तकांना शासकीय पुरस्कार लाभला. काव्यलेखनासाठी ‘ग.दि.मा. गीतलेखन पुरस्कार’ ही त्यांना प्राप्त झाला.
मराठी सारस्वताची अखंड सेवा करत असतानाच त्यांची प्राणज्योत (२००२) मालवली. त्या वेळी ‘असेन मी नसेन मी... ’ ही त्यांचीच कविता उभ्या महाराष्ट्राला चटका लावणारी ठरली.
आशा भोसले
आशा भोसले
गेली सुमारे ६० वर्षे रसिकांना असीम आनंद देणार्या शतपैलू, चिरतरुण गायिका!
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही, त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही. असा अद्वितीय आवाज म्हणजेच अर्थात आशाताई भोसलेंचा आवाज. महाराष्ट्राला लाभलेलं हे सुरांचं देणं. जुन्यांसाठी तितकंच जुनं, मुरलेलं आणि नव्यांसाठीही तितकंच नवं, ताजं.
मंगेशकर कुटुंबातला त्यांचा जन्म, मा. दीनानाथांचा मिळालेला वारसा, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचं मार्गदर्शन व त्यांची साथ-या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. आशाताईंनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लतादीदी, शमशाद बेगम, गीता दत्त अशा बड्या गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणं अवघड होतं. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं, स्वत:ला सिद्ध करण्याचं फार मोठं आव्हान आशाताईंपुढं होतं. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांचा सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारलं. त्यांनी ते स्वबळावर, आत्मविश्वासानं, यशस्वीपणे पेलूनही दाखवलं.
१९५७-५८ हे वर्ष आशाताईंचं होतं. सचिन देव (एस.डी.)बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असं‘य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशकं आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचं कोंदण दिलं. एवढंच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यातल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केलं.
ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. १९६० च्या सुमारास नय्यर यांचं संगीत असणारं ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूँ ) हे गाणं; १९६५ चं ‘जाईंये आप कहां’ (मेरे सनम); १९६८ मधलं ‘वो हसीन दर्द देदो’ (हम साया); चैन से हमको कभी -अशी मदहोश करणारी गाणी रसिकांच्या हृदयावर राज्य करायला लागली.
आर. डी. बर्मन यांच्याबरोबर काम करताना ‘पिया तू अब तो आजा’ हे १९७१ चे कारवॉं चित्रपटातील गीत, १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे -ही गाणी आशाताईंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन आँखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळंच जमून आलं. ‘दिल चीज क्या है’ या गीताला १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हिंदीबरोबर आशाताईंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोेघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजूनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी सगळंच विलक्षण!
त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार; ते गीतकार; त्या अभिनेत्री आणि आशाताईंचा आवाज- या सर्वांच्या परस्परसंबंधांचे सं‘यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.
हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशाताईंनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्र्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी महंमद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज ऋषिकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.
नाच रे मोरा-आईए मेहेरबॉं-दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत)-तनहा तनहा यहां पे जीना-जिवलगा राहिले रे दूर घर माझे-रंग दे मुझे रंग दे- सांज ये गाकुळी-जानम समझा करो-मागे उभा मंगेश... ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्र्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीतं, मराठी-हिंदी चित्रपट गीतं, नाट्यगीतं, गझल, लावणी, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गाऊ शकतात. हे शतपैलुत्व अलौकिक आहे, एकमेवाद्वितीय आहे.
कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, दुबई, स्वीडन आदी अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेलं काम, ‘राहुल अँड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईसबरोबरचं काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. काही महिन्यांपूर्वी, वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा अँड फ्रेंड्स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. अभिजात संगीत कलेला जसं स्थळ-काळ-वेळाचं बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचंच बंधन नाही.
राष्ट्रीय पुरस्कार, असंख्य फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.
आशाताई मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणार्या ,किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणार्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत. म्हणूनच आजच्या स्पर्धेच्या युगात एखाद्या दूरदर्शन वाहिनीवरील स्पर्धेत (रअँलिटी शोमध्ये)‘महागुरू’ची भूमिका निभावताना त्यांना अवघडल्यासारखं वाटतं. एखाद्या स्पर्धकाला स्पर्धेबाहेर काढण्याचा निकाल देताना आजही त्यांचे डोळे पाणावतात.
विजय तेंडुलकर
विजय तेंडुलकर
शतकातून एखादाच होणारा असा बंडखोर, निर्भीड, द्रष्टा व सिद्धहस्त नाटककार!
विजय तेंडुलकर हे मराठी नाव असलं तरी या नावानं मराठीपणाच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत. सामान्य माणसाच्या नि:शब्दतेला आवाज देणारा माणूस अशी बिरुदावली मिरवणार्या तेंडुलकरांनी भारतीय रंगभूमीच्या इतिहासातच नाही तर जागतिक रंगभूमीच्या इतिहासात स्वत:चं स्थान ठळक केलं. फार कमी भारतीय लेखकांना ही गोष्ट साध्य झाली आहे. त्यांची रंगभूमीवरची धगधगती कारकीर्द पाहिली की, खरंच प्रश्र्न पडतो, की तेंडुलकरांनी कशाच्या बळावर एवढा विस्मयकारी प्रवास केला असावा?
विजय धोंडोपंत तेंडुलकर असं साधं, सरळ नाव धारण करणार्या या माणसाकडं ना लौकिक शिक्षणाची शिदोरी होती, ना लेखनाचा कौटुंबिक वारसा! पण हा माणूस जीवनाच्या शाळेत मात्र भरपूर शिकला आणि जे शिकलं, जे अनुभवलं ते लेखनात उतरवत गेला. त्यामुळेच तेंडुलकर नाटकाला वास्तव पातळीवर आणून, मानवी जीवनातील विविध स्तर लेखनातून उलगडून दाखवू शकले.
जीवनाच्या शाळेत शिकत असतानाच तेंडुलकरांना त्यांचे अभ्यासविषय मिळत गेले. त्यातही माणसाचं जगणं हा त्यांचा अधिक जिव्हाळ्याचा विषय. विषयाच्या या वेगळेपणानंच त्यांना वैश्विक पातळीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या मते लेखन हे जगण्यातून येतं. त्यामुळे जगणं महत्त्वाचं!
त्यांचं लिखाण कधी एखाद्या परंपरागत पठडीत अडकलं नाही. त्यांनी आपल्या लेखनातून कधी एखादा सामाजिक प्रश्र्न हातळला नाही की, कधी एखाद्या घडून गेलेल्या घटनेचा तपशील दिला नाही. त्यांच्या लेखनाचा मध्यबिंदू होता मानवी स्वभाव आणि मानवी जीवन! मानवी स्वभावाचे आयाम त्यांच्या ‘गिधाडे’ आणि ‘सखाराम बाईंडर’ मध्ये हिंसेचं रूप घेऊन येतात, तर ‘घाशीराम कोतवाल’ मध्ये प्रच्छन्न लैंगिकतेचं रूप घेऊन येतात. खोट्या साधनशूचितेला लक्ष्य करणार्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ मध्ये तेंडुलकर समाजमनाचा एक वेगळाच पैलू आपल्यासमोर मांडतात.
मराठी नाटकांना नवतारुण्य प्रदान करणारा नाटककार म्हणून तेंडुलकरांना गौरवले जाते. त्यांचे कथाविषय धाडसी होते आणि ते त्यांनी तितक्याच निर्भिडपणे समाजासमोर मांडले. त्या अर्थाने ते काळाच्या खूप पुढे होते. चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी हाताळलेले विषय आजच्या परिस्थितीलाही तंतोतंत लागू पडतात, आणि हीच गोष्ट त्यांचे द्रष्टेपण सिद्ध करते. १९५५ च्या सुमारास संगीत नाटकांच्या साखर झोपेत असणारी प्रेक्षकमंडळी तेंडुलकरांच्या नाटकांनी हादरली. त्या वेळच्या रसिक प्रेक्षकांनीच नाही, तर समीक्षकांनीही तेंडुलकरांवर भरपूर तोंडसुख घेतले. त्यांच्या याच नाटकांमुळे नंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धनी झालेल्या तेंडुलकरांना त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मात्र विखारी टीकेला सामोरे जावे लागले. समाजाकडून झालेल्या या अवहेलनेवर तेंडुलकरांची प्रतिक्रिया बोलकी आणि त्यांच्या लेखनाचा हेतूच स्पष्ट करणारी होती. ते म्हणतात की, माझी लेखनाची गरज मला माझ्यासारखं लिहू द्यावं एवढीच होती. ‘लिहिणं’ ही माझी गरज होती. त्यामागे कुणाचं बरं-वाईट करावं, कशाला वळण द्यावं असला काहीही हेतू नव्हता.
काय खपणार आहे, याचा विचार तेंडुलकरांनी लिहिताना कधीच केला नाही. यापेक्षा सध्या समाजमनाला कोणत्या विचारांची गरज आहे आणि त्यादृष्टीने मानवी सहवेदना कशा प्रकारे सादर करायची आहे, याचे तारतम्य त्यांनी कायमच राखले. म्हणूनच भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील ते एक सर्वोत्कृष्ट नाटककार ठरले. तेंडुलकरांनी आपल्या वैचारिक बंडखोरीने नाटकातील निव्वळ आशायाच्याच चौकटी मोडल्या नाहीत तर पटकथा, संवाद, नेपथ्य यांनाही ‘नवी भाषा’ दिली.
तेंडुलकरांच्या नाटकाची भाषा हा तर एक स्वतंत्र अभ्यासविषयच आहे. अत्यंत साध्या आणि नेटक्या भाषेतून त्यांचा कथाविषय उलगडत जातो. ही भाषा ऐकायला आणि वाचायला सोपी वाटली, तरी विलक्षण गुंतागुंतीच्या भावना व्यक्त करते. त्यांचे नेमके शब्द अपेक्षित परिणाम साधतात. शब्दरचना एवढी नेमकी व परिपूर्ण की, एकही शब्द अधिक-उणा करता येणार नाही. त्यांच्या भाषेला एक लय आहे, पण म्हणून ती पद्यात्मक नाही, उलट प्रसंगी अतिशय गद्य आणि वास्तव आहे. त्यांच्या चित्रपटाच्या पटकथा आणि नाटकं पाहण्याइतकीच वाचनीयही आहेत. ती वाचताना त्यांची या माध्यमावरची पकड आपल्याला अवाक करते. त्यांच्या नाटकांना दिग्दर्शकाची गरजच भासणार नाही अशी त्यांची रचना असे. काय करायचे आहे याचा सर्व तपशील कंसांत दिलेला. कंसात दिलेल्या या सूचना नटाला मार्गदर्शन तर करतातच, पण त्या कथेचा अविभाज्य भाग असतात आणि कथेचा ओघ पुढे नेण्यास साहाय्य करतात. थोडक्यात, तेंडुलकरांनी नाटक सादर करण्याची, लिहिण्याची आणि चित्रपट कथांचीही भूमिती बदलून टाकली.
तेंडुलकरांची बाह्य प्रतिमा जितकी शांत आणि मितभाषी होती, तितकीच त्यांची नाटके दाहक आणि वास्तव होती. ‘हिंसा’ त्यांच्या चिंतनाचा विषय होता. हिंसा माणसामध्ये उपजतच असते असं त्यांचं मत होतं. त्यांच्या सर्वच नाटकांतून आपल्याला हिंसेचे विविध आविष्कार पाहायला मिळतात.
तेंडुलकरांनी आपल्या लिखाणातून मानवी मनाच्या कुरुपतेचं वर्णन केलं असलं, तरी प्रत्यक्ष जीवनात ते कमालीचे सकारात्मक होते. याचं स्पष्टीकरण देताना ते एके ठिकाणी म्हणतात की, स्वत:चं आयुष्य जगताना आणि दुसर्यांचं अनुभवताना जे बोलायचं होतं, सांगायचं होतं, ते लेखनातून व्यक्त होत गेलं. गरजेतून जशा वाटा सापडतात, तशीच ही लेखनाची वाट मला अनाहूतपणे मिळाली.
आपल्या लिखाणातून समाजमनाचा वेध घेणार्या या लेखकाचा पिंडही सामाजिकतेचा होता. त्यांच्या मनाचा ओढा चळवळींकडे होता. नर्मदा बचाव आंदोलन, ग्रंथालीसार‘या सांस्कृतिक चळवळी, विचार स्वातंत्र्य मानणार्या चळवळी, रंगभूमीवरचे वेगवेगळे प्रयोग यात त्यांनी कायमच सक्रिय पुढाकार घेतला. काही काळ ते सेवादलाचे कार्यकर्तेही होते. त्यांच्या विचारातील ही कृतिशील सामाजिकता व व्यापकताच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर नेऊन ठेवत असे.
तेंडुलकरांनी मराठी नाटकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं हे तर खरंच, पण ते केवळ नाटककार नव्हते तर उत्कृष्ट दर्जाचे समीक्षक आणि दर्दी रसिकही होते. ते सौंदर्यवादी होते आणि आयुष्यभर लहान-सहान गोष्टीतले सौंदर्य टिपतच जगले. अभिजात कलागुणांचे ते चाहते होतेच, पण विशेष म्हणजे नवविचारांचे आणि आयुष्यातील सर्व प्रकारच्या नवतेचे चाहते होते. अशा विचारांचे, साहित्याचे, कलेचे आणि ती निर्माण करणार्या कलाकारांचे त्यांनी कायम स्वागतच केले.
जानेवारी, १९२८ मध्ये कोल्हापूर येथे जन्मलेल्या तेंडुलकरांचं शिक्षण दहावीपर्यंतच झालं. पण शाळेचं आणि महाविद्यालयाचं शिक्षण नसतानाही माणूस काय पराक्रम करू शकतो, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं. १९४८ साली त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. पण त्यांच्या लेखनाला खरा बहर आला १९५५ नंतर. कारकीर्दीच्या सुरुवातीला काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. सुरुवातीचा काही काळ लोकसत्तामध्ये सहसंपादक म्हणून काम केलं, तर पुढे काही काळ मराठा, नवयुग साप्ताहिक, वसुधा मासिक इथेही नोकरी केली. १९७८-८१ च्या दरम्यान त्यांनी टाटा समाज विज्ञान संस्थेत अध्यापनाचेही काम केले.
आज जगात असा एकही रंगमंच नसेल जिथं तेंडुलकरांची नाटकं झालेली नाहीत. त्यांच्या नाटकांचे आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केले जातात आणि भले-भले नट त्यातून काम करण्यात धन्यता मानतात. हे सर्व पाहिल्यावर वाटतं की, तेंडुलकर मराठी होते हे आपलं भाग्य म्हणावं लागेल.
तेंडुलकरांना मिळालेले मान-सन्मान -
- १९८४ - पद्मभूषण.
- १९७१ - संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार.
- १९९१ - कालिदास पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार.
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पहिला जनस्थान पुरस्कार.
- `अर्धसत्य' - पटकथा लेखनाबद्दल फिल्मफेअर पुरस्कार.
- `आक्रोश' - पटकथा आणि संवादाबद्दल फिल्मफेअर पुरस्कार.
- ‘देशातील वाढता हिंसाचार’ यावर अभ्यास करण्यासाठी नेहरू शिष्यवृत्ती प्रदान.
पु.ल.देशपांडे
पु.ल.देशपांडे
साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आदी क्षेत्रांत ज्यांना अभिव्यक्तीची ‘अमृतसिद्धी’ साध्य झाली होती आणि ज्यांची ‘साठवण’ मराठीजनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे ‘आनंदयात्री’!
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान... आदी भावनांचं सर्वाधिक प्रकटीकरण ज्यांच्याबाबत महाराष्ट्रानं अनुभवलं ते व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे! त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. लेखनातही तोचतोचपणा नाही. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. गांधीजींचं चरित्रलेखन, बंगाली भाषेचा अभ्यास, रवींद्रनाथांच्या कवितांचा अनुवाद याही वेगळ्या प्रकारच्या लेखनातून पु. ल. आपल्याला भेटतात. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय.... कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन... या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला.
वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे ‘कोट्याधीश’ पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.
पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’ म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले.
भास्कर संगीतालयाच्या दत्तोपंत राज्योपाध्यांकडून घेतलेलं हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण हा पु. लं. चा आणखी एक पैलू. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, मिल्लिकार्जुन मन्सूर अशा दिग्गजांना त्यांनी हार्मोनियमवर समर्थ साथ केली. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफितीही उपलब्ध आहेत.
सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्यावरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं.
राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला.
पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं दिसतात. त्यांच्या लेखनासह, वक्तृत्वातही संदर्भांची श्रीमंती जाणवते. संस्कृत सुभाषिते, वेद-पुराणे, संतसाहित्य, म्हणी-वाक्प्रचार, यांसह विविध संस्कृतींमधले, जीवनव्यवहारातले अनेक संदर्भ पु. लं. च्या समृद्ध लेखनात आढळतात. यामुळेच त्यांची निवेदन-शैलीही उठून दिसते!
साहित्य-नाटक-संगीत या क्षेत्रात प्रवेश करणार्या नवोदिताला शाबासकीची थाप द्यावी ती पु.लं. नीच. ‘ती फुलराणी’ करताना भक्ती बर्वे-इनामदारांना हाच अनुभव आला. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचं गायन ऐकून ते आवडल्याचं कळवणारा फोन रात्री ११:०० वाजता करून प्रोत्साहन देणारे पु. ल. वेगळेच. तरुण संगीतकार सलील कुलकर्णींच्या बालगीतांच्या ध्वनिमुद्रिकेचं भरभरून कौतुक करणारे पु. ल. च होते. मुस्लीम समाजात काम करणार्या हमीद दलवाईंबद्दल पहिल्यांदा पु. लंनीच लिहिलं. एका अनोळखी दिग्गजाची ओळख सामान्य वाचकांना करून दिली. समोरच्या व्यक्तीमधल्या चांगल्या गोष्टी ओळखून त्या इतरांना सांगण्याची क्षमता फार कमी लोकांकडे असते आणि त्यापैकी एक पु. ल. होते.
पु.लं. मधला दाता खूप जणांना अनोळखी असेल. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्या पु. ल. व सुनीताबाई या दांपत्याने बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. सुनिताबाईंसारख्या सहधर्मचारिणीच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे फाउंडेशन उभं राहिलं. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पुढील संस्था - व्यक्तींना मदत केली.
- अंध व्यक्तींसाठी देणगी - उत्तमोत्तम मराठी साहित्य ब्रेल लिपीत आणण्यासाठी आर्थिक मदत.
- वेश्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्या निहार या संस्थेला सहकार्य.
- कोयना भूकंपग्रस्त मुलांसाठी मदत.
- ग्रामीण स्तरावरील शास्त्र प्रयोगशाळेलाही मदत.
- मुंबई येथील एशियाटिक सोसायटी या संस्थेला सहकार्य.
कलाक्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे पु. ल. देशपांडे पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. मध्य प्रदेश, कलकत्ता, गोवा या राज्यांतूनही पु. लं. ना पुरस्कार मिळाले आणि हा मराठी साहित्यिक भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक सीमा ओलांडून पार गेला.
‘जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काही नाही’, अशी जीवनाकडं बघण्याची त्यांची वृत्ती आपले आयुष्य आणखी सुंदर बनवते. जीवन सुंदर करू पाहणार्या चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्या जीवनातून व अभिव्यक्तीतूनही स्पष्टपणे जाणवतो. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ ही म्हटले जाते. अवघ्या महाराष्ट्रावर प्रदीर्घ काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंदयात्री १२ जून, २००० ला जग सोडून गेला खरा, पण त्यांचं अस्तित्व आजही मराठी मनात शाबूत आहे.
साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आदी क्षेत्रांत ज्यांना अभिव्यक्तीची ‘अमृतसिद्धी’ साध्य झाली होती आणि ज्यांची ‘साठवण’ मराठीजनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे ‘आनंदयात्री’!
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान... आदी भावनांचं सर्वाधिक प्रकटीकरण ज्यांच्याबाबत महाराष्ट्रानं अनुभवलं ते व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे! त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. लेखनातही तोचतोचपणा नाही. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. गांधीजींचं चरित्रलेखन, बंगाली भाषेचा अभ्यास, रवींद्रनाथांच्या कवितांचा अनुवाद याही वेगळ्या प्रकारच्या लेखनातून पु. ल. आपल्याला भेटतात. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय.... कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन... या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला.
वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे ‘कोट्याधीश’ पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.
पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’ म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले.
भास्कर संगीतालयाच्या दत्तोपंत राज्योपाध्यांकडून घेतलेलं हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण हा पु. लं. चा आणखी एक पैलू. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, मिल्लिकार्जुन मन्सूर अशा दिग्गजांना त्यांनी हार्मोनियमवर समर्थ साथ केली. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफितीही उपलब्ध आहेत.
सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्यावरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं.
राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला.
पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं दिसतात. त्यांच्या लेखनासह, वक्तृत्वातही संदर्भांची श्रीमंती जाणवते. संस्कृत सुभाषिते, वेद-पुराणे, संतसाहित्य, म्हणी-वाक्प्रचार, यांसह विविध संस्कृतींमधले, जीवनव्यवहारातले अनेक संदर्भ पु. लं. च्या समृद्ध लेखनात आढळतात. यामुळेच त्यांची निवेदन-शैलीही उठून दिसते!
साहित्य-नाटक-संगीत या क्षेत्रात प्रवेश करणार्या नवोदिताला शाबासकीची थाप द्यावी ती पु.लं. नीच. ‘ती फुलराणी’ करताना भक्ती बर्वे-इनामदारांना हाच अनुभव आला. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचं गायन ऐकून ते आवडल्याचं कळवणारा फोन रात्री ११:०० वाजता करून प्रोत्साहन देणारे पु. ल. वेगळेच. तरुण संगीतकार सलील कुलकर्णींच्या बालगीतांच्या ध्वनिमुद्रिकेचं भरभरून कौतुक करणारे पु. ल. च होते. मुस्लीम समाजात काम करणार्या हमीद दलवाईंबद्दल पहिल्यांदा पु. लंनीच लिहिलं. एका अनोळखी दिग्गजाची ओळख सामान्य वाचकांना करून दिली. समोरच्या व्यक्तीमधल्या चांगल्या गोष्टी ओळखून त्या इतरांना सांगण्याची क्षमता फार कमी लोकांकडे असते आणि त्यापैकी एक पु. ल. होते.
पु.लं. मधला दाता खूप जणांना अनोळखी असेल. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्या पु. ल. व सुनीताबाई या दांपत्याने बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. सुनिताबाईंसारख्या सहधर्मचारिणीच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे फाउंडेशन उभं राहिलं. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पुढील संस्था - व्यक्तींना मदत केली.
- अंध व्यक्तींसाठी देणगी - उत्तमोत्तम मराठी साहित्य ब्रेल लिपीत आणण्यासाठी आर्थिक मदत.
- वेश्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्या निहार या संस्थेला सहकार्य.
- कोयना भूकंपग्रस्त मुलांसाठी मदत.
- ग्रामीण स्तरावरील शास्त्र प्रयोगशाळेलाही मदत.
- मुंबई येथील एशियाटिक सोसायटी या संस्थेला सहकार्य.
कलाक्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे पु. ल. देशपांडे पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. मध्य प्रदेश, कलकत्ता, गोवा या राज्यांतूनही पु. लं. ना पुरस्कार मिळाले आणि हा मराठी साहित्यिक भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक सीमा ओलांडून पार गेला.
‘जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काही नाही’, अशी जीवनाकडं बघण्याची त्यांची वृत्ती आपले आयुष्य आणखी सुंदर बनवते. जीवन सुंदर करू पाहणार्या चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्या जीवनातून व अभिव्यक्तीतूनही स्पष्टपणे जाणवतो. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ ही म्हटले जाते. अवघ्या महाराष्ट्रावर प्रदीर्घ काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंदयात्री १२ जून, २००० ला जग सोडून गेला खरा, पण त्यांचं अस्तित्व आजही मराठी मनात शाबूत आहे.
शाहीर अण्णा भाऊ साठे
शाहीर अण्णा भाऊ साठे
शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. त्या काळातील कुरुंदवाड संस्थानातील वटेगावमध्ये १९२० साली त्यांचा जन्म झाला. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज मुंबईत पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.
चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलीशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली.
१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.
१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत.
मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलीश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.
लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेता साहित्य क्षेत्रात जगप्रसिद्ध झालेला हा कलाकार काही दुर्दैवी (वैयक्तिक कौटुंबिक) संघर्षांमुळे खचत गेला. त्यांच्या शेवटच्या काळात महाराष्ट्र सरकारने त्यांना बरेच सहकार्य केले. मनाने खचल्यानेच १८ जुलै, १९६९ रोजी अण्णा भाऊंचे निधन झाले. त्यांच्या साहित्याच्या व कार्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक अन्यायामुळे जो समाज शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्या समाजामध्ये आत्मविश्र्वास व प्रगतीची आस निर्माण केली.
वैयक्तिक दु:खांचा विचार न करता;
आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा
प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर!
शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. त्या काळातील कुरुंदवाड संस्थानातील वटेगावमध्ये १९२० साली त्यांचा जन्म झाला. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज मुंबईत पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.
चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलीशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली.
१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.
१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत.
मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलीश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.
लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेता साहित्य क्षेत्रात जगप्रसिद्ध झालेला हा कलाकार काही दुर्दैवी (वैयक्तिक कौटुंबिक) संघर्षांमुळे खचत गेला. त्यांच्या शेवटच्या काळात महाराष्ट्र सरकारने त्यांना बरेच सहकार्य केले. मनाने खचल्यानेच १८ जुलै, १९६९ रोजी अण्णा भाऊंचे निधन झाले. त्यांच्या साहित्याच्या व कार्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक अन्यायामुळे जो समाज शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्या समाजामध्ये आत्मविश्र्वास व प्रगतीची आस निर्माण केली.
लता मंगेशकर
लता मंगेशकर
कलेवरील दृढ निष्ठा, अपूर्व भक्ती,
अखंड साधना यांच्या साहाय्याने भारतीय संस्कृतीचे प्रतीक ठरणारा विशुद्ध,
अनाहत स्वर साकार करणार्या सर्वश्रेष्ठ गायिका!
भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर म्हणजे चित्रपट पार्श्र्वगायन क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राज्ञी. त्यांची थोरवी व त्यांचे चित्रपट पार्श्र्वगायनातील योगदान याचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडावे इतके त्यांचे कार्य व त्यांचा लौकिक मोठा आहे. लता मंगेशकर यांच्या प्रमुख उल्लेखाशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचं, संगीत क्षेत्राचं वर्णन पूर्ण होणारच नाही. नुसत्याच महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण भारत देशाला ललामभूत असणार्या आणि भारताचं नाव जगातील संगीत क्षेत्रात सतत उच्चस्थानावर ठेवणार्या एकमेवाद्वितीय कलावंत म्हणजे लता मंगेशकर; सर्व भारतीयांच्या लतादीदी!
१९२९ मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शुद्धमती उर्फ माई मंगेशकर यांच्या पोटी लतादीदींचा जन्म झाला. पाच भावंडांत सर्वात मोठ्या म्हणून त्यांची सर्व भावंडे त्यांना लतादीदी किंवा ‘दीदी’ असेच म्हणतात. तेच नाव इतर निकटवर्तीयही प्रेमाने घेतात. मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी संगीत नाट्यक्षेत्रातील एक गाजलेले, दिग्गज गायक. याच श्रेष्ठ पित्याचा वारसा त्यांच्या पाचही अपत्यांना म्हणजेच लता, आशा, मीना, उषा व हृदयनाथ यांना अगदी भरभरून मिळाला. ही सर्व भावंडे संगीताची सेवा-आराधना आयुष्यभर करत आली आहेत व आपल्या कर्तृत्वाने त्यांनी आपला स्वरगंध भारतातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडेही पसरवला आहे. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हेच त्यांचे पहिले गुरूही. सुरुवातीला दीदींनी काही काळ वडिलांकडूनच संगीताचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खान, पं. अमान अली खान (भेंडीबाजारवाले), उस्ताद अमानत खान आणि काही काळ पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.
दिनांक १६ डिसेंबर, १९४१ रोजी पहिले गाणे आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले. १९४२ साली लतादीदींनी चित्रपटासाठी पहिले गाणे गायले आणि नंतरचे सुमारे अर्धशतक त्या गातच राहिल्या. आजही त्या एखाद-दुसरे गीत गातात, एखाद्या ध्वनिमुद्रिमेच्या माध्यमातून आपला ‘अभिजात’ सूर ऐकवून रसिकांना आनंद देतात. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे वयाच्या १३ व्या वर्षीच पूर्ण कुटुंबाच्या लालनपालनाची जबाबदारी त्यांच्या कोमल खांद्यावर येऊन पडली. प्रथम अर्थार्जनासाठी म्हणून त्या चित्रपट पार्श्र्वगायनाकडे वळल्या. त्यांना सुरुवातीची काही वर्षे अतिशय शारीरिक, मानसिक व भावनिक हालअपेष्टांमध्ये काढावी लागली.
पार्श्वगायक व पार्श्वगायिका यांना त्या काळात ‘रॉयल्टी’ तर सोडाच पण मानधनही धड मिळत नसे. पण या परिस्थितीशी झगडत, नेटाने प्रयत्न करत लतादीदींनी या क्षेत्रात त्यांची मार्गक्रमणा सातत्याने आणि धैर्याने केली. पार्श्वगायकाचा वा गायिकेचा उल्लेखही चित्रपटाच्या नामोल्लेखात त्या वेळी केला जात नसे. केवळ मुख्य नायिकेला श्रेयनामावलीत स्थान असे. लतादीदींनी आपल्या कलेद्वारे व आपल्या खंबीर भूमिकेद्वारे ही पद्धत बदलून नामोल्लेखात पार्श्वगायक व गायिकेच्या नावाचा उल्लेख करण्याचा पायंडा पाडला. याचं श्रेय पूर्ण चित्रपट सृष्टी लतादीदींनाच देते.
लतादीदिंनी जवळ जवळ पावणे दोनशे संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर काम केले असून, सुमारे २३ भाषांमध्ये हजारो गाणी गायलेली आहेत. सी. रामचंद्र, सलील चौधरी, नौशाद, मदनमोहन, सचिनदेव बर्मन, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम, पंचमदा (राहूल देव बर्मन), दत्ता डावजेकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे व पं. हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या स्वररचनांना लतादीदींचा स्वर्गीय स्वर लाभल्यामुळे अजरामर गाणी निर्माण झाली.
संत तुकारामांच्या अभंगगाथेतील अभंग, संत ज्ञानेश्र्वरांचे अभंग, विराण्या; लावण्या, बालगीत, अंगाईगीत, देशभक्तीपर गीत, धृपद, कव्वाली, रवींद्र संगीत; शांता शेळके, पी. सावळराम, मंगेश पाडगावकर, कवी कुसुमाग्रज, ग्रेस अशा दिग्गज कवींच्या रचना; गालिबच्या उर्दूतील गझल - हे सगळेच गानप्रकार लतादीदींच्या आवाजाने लीलया पेलले, इतकेच नव्हे तर सर्व गाणी अमृतमय झाली.
हिंदी चित्रपटांत पार्श्र्वगायन, मराठी चित्रपटगीते व मराठी भावगीते-भक्तिगीते या प्रमुख क्षेत्रांमध्ये दीदींनी संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या अविश्वसनीय, अद्वितीय असे योगदान दिले आहे. हिंदी चित्रपटांत सलील चौधरी, खेमचंद्र प्रकाश, नौशाद यांच्यापासून ते ए. आर. रहमान यांच्यापर्यंतच्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. हिंदी व मराठीमध्ये त्यांनी प्रामुख्याने मोहम्मद रफी, किशोर कुमार, हेमंतकुमार, मन्ना डे, मुकेश, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुधीर फडके, पं. हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर या दिग्गज गायक-गायिकांसह युगुलगीते गायली आहेत. लतादीदींनी ‘आनंदघन’ या नावाने ५ मराठी चित्रपटांना उत्कृष्ट संगीतही दिले आहे. या महान गायिकेने हजारो गाणी गायली आहेत, त्यातील अक्षरश: शेकडो ‘सार्वकालिक सर्वश्रेष्ठ’ आहेत. त्यांचे ‘मालवून टाक दीप’ श्रेष्ठ की ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ श्रेष्ठ यावर लिहिण्यासाठी समीक्षकांच्या लेखण्या सरसावतात. त्यांचं ‘आएगा आनेवाला’ श्रेष्ठ की ‘रसिक बलमा’ त्याहून श्रेष्ठ अशा रसिकांच्या चर्चा आजही रंगतात. ध्वनिमुद्रणाच्या ठिकाणी किंवा रंगमंचावरून गाताना नेहमी अनवाणी होऊनच सादरीकरण करणार्या या सरस्वतीच्या सच्च्या उपासक! यांच्या हिंदी-मराठी गीतांची, त्यांच्या सहकलाकारांची (संगीतकार, गीतकार, सहगायक, सहवादक, ज्यांना आवाज दिला, त्या अभिनेत्री) केवळ यादी करणे - हा देखील एक मोठा अभ्यासाचा, संशोधनाचा विषय आहे. खरे तर त्यांच्या एका-एका गीतावर रसिक आयुष्य ओवाळून टाकतात. पण त्यातही त्यांनी गायलेली श्रीगणपतीची आरती; त्यांनी सुरांच्या साहाय्याने मागितलेले ‘पसायदान’, शिवरायांची सावरकरकृत आरती पुढच्या अनेक मराठी पिढ्या ऐकणार आहेत, आणि त्यांचे ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत ऐकून हजार वर्षानंतरचा भारतीय माणूसही भारावून जाणार आहे हे निश्चित!
लता मंगेशकर हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती भारतात आढळणं कठीण आहे. पूर्ण जगभर लतादीदींचे असंख्यचाहते आहेत. लंडन येथील रॉयल अॅल्बर्ट हॉल येथे गाणारी आशिया खंडातील पहिली गायिका असा त्यांचा मान आहे. एकामागोमाग एक असे तीन कार्यक्रम त्याच सभागृहात ‘हाऊस फुल्ल’ गर्दीत यशस्वी करणार्या त्या पहिल्या कलावंत आहेत.
लतादीदींना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीसाठी, प्रामुख्याने पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करण्यात आला. तसंच त्यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारही देण्यात आला. महाराष्ट्र शासनानेही राज्य स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार - ‘महाराष्ट्र भूषण’ - देऊन दीदींचा गौरव केला. त्यांना त्यांच्या संगीतातील कामगिरीबद्दल अनेक मान सन्मान व पदव्या मिळाल्या आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाची मानद डी. लिट् ही पदवी, खैरागड संगीत विद्यालय, हैद्राबाद विश्वविद्यालयातर्फे डॉक्टरेट, बालाजी मंदिर ट्रस्ट (तिरुपती) येथील ‘विद्वान’ किताब, संकेश्वर येथील शंकराचार्यांकडून ‘स्वरभारती’ हा किताब, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण - अशी असंख्य पुरस्करांची मोठी सूची करता येईल. या जाहीर मानसन्मान आणि पदव्या-पुरस्कारांबरोबरच त्यांचे असंख्य चाहते आणि श्रोते त्यांना ‘स्वरसम्राज्ञी’, ‘गानकोकिळा’, ‘गानसम्राज्ञी’ या अशा उत्स्फूर्त पदव्यांनी संबोधतात. ’Indian Nightingle’ हा किताबही त्यांना देण्यात आला आहे. या अशा एक ना अनेक पुरस्कारांनी मंडित लतादीदी एकप्रकारे आख्यायिकाच बनून गेल्या आहेत.
लतादीदींना पार्श्वगायनासाठी चार वेळा ‘फिल्मफेअर अँवॉर्ड मिळाले आहे. १९६९ नंतर नवीन कलाकारांना संधी मिळावी म्हणून त्यांनी हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्या काळात जेव्हा हा एक पुरस्कार मिळणं हे अतिशय प्रतिष्ठेचे समजले जायचे, अशा वेळेला नवीन कलाकारांना संधी मिळण्यासाठी आपला मान बाजूला ठेवण्याची ही लतादीदींची कृती खरोखरच त्यांच्या शालीनतेची ग्वाही देते. दैवी गळ्याबरोबर विशाल मनही लतादीदींकडे आहे याचंच हे द्योतक आहे. त्यांना असंख्य पुरस्कार तर प्राप्त झालेच आहेत, शिवाय त्यांच्या नावाने श्रेष्ठ कलाकारांना पुरस्कारही देण्यात येतात. महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासनातर्फे त्यांच्या नावाने संगीत क्षेत्रात अतुलनीय कार्य करणार्या कलाकाराला पुरस्कार दिला जातो.
इतके मानसन्मान, ऐश्वर्य यांच्यासह सतत प्रसिद्धीच्या झोतात असूनसुद्धा स्वत: लतादीदी अत्यंत साध्या आहेत. त्या अत्यंत साधेपणाने राहतात. स्वच्छ परिटघडीची पांढरी साडी, दोन लांब वेण्या, दोन्ही खांद्यावरून पूर्ण अंगभर घेतलेला पदर, विनम्र नाजूक बोलणं, निरागस हास्य (आणि ऐश्वर्याची एकच खूण म्हणून की काय कानातल्या हिर्यांच्या कुड्या) असं लतादीदींचं शालीन व्यक्तिमत्त्व पाहिलं की पूर्ण भारतीय शील, संयम, सौंदर्य आणि संस्कृती यांचं चालतंबोलतं प्रतीक म्हणजे लतादीदी, असं प्रतिबिंब प्रत्येकाच्याच मनात उमटतं.
लतादीदी अतिशय संवेदनशील आहेत. मुक्या प्राण्यांवर त्यांचं निरातिशय प्रेम आहे. लतादीदी कमालीच्या ईश्वरभक्त आहेत. त्या मुंबईत त्यांच्या ‘प्रभूकुंज’ या घरी असोत किंवा देशा-विदेशात असोत, त्यांच्या पूजाअर्चा, व्रतवैकल्यात कधीही खंड पडत नाही. त्या ‘आपल्या’ माणसांना खूप जपतात आणि त्यांची प्रेमळपणाने काळजी घेतात. आपल्याबरोबरच्या अगदी ज्युनियर कलावंतांची सुद्धा अगदी घरच्या नातेवाईकासारखी काळजी वाहतात आणि त्यांना बरोबरीची वागणूक देतात. परदेशात त्यांच्याबरोबर दौरा करणार्या कलावंतांच्या जणू त्या आईच असतात. इतक्या उंचीवर पोहोचल्यावरदेखील त्या विनम्रशील आहेत. संगीत दिग्दर्शक अनुभवी असो वा नवखा पण त्या एका विद्यार्थ्याच्या भावनेनेच त्या संगीतकाराकडे गाणं शिकतात आणि परिपूर्णतेच्या ध्यासापायी कार्यक्रमापूर्वी किंवा ध्वनिमुद्रणापूर्वी अनेक वेळा गाण्याची तालीम करतात.
लतादीदींना छायाचित्रणाचा विलक्षण छंद आहे. त्या स्वत: उत्तम फोटोग्राफी करतात. वाचन हा लतादीदींचा दुसरा आवडीचा छंद आहे. लतादीदींना क्रिकेटमध्येही खूप रस आहे. जेव्हा शक्य असेल, तेव्हा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी त्या स्टेडियमवरही जातात. १९८३ साली तर त्यांनी विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी विशेष कार्यक्रम सादर केला होता. क्रिकेट पंढरी लॉर्डस् स्टेडियमवर त्यांच्यासाठी एक खास कक्ष कायमस्वरूपी आरक्षित करण्यात आलेला आहे.
राष्ट्रभक्ती व सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. कोणाला आर्थिक मदत सढळ हाताने करणे असो किंवा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलचे बांधकाम व व्यवस्थापन असो लतादीदींनी अशा अनेक समाजोपयोगी कार्यांना फार गाजावाजा न करता खूप मदत केली आहे. श्रीकृष्ण, मंगेशी, संत ज्ञानेश्र्वर, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर ही त्यांची श्रद्धा स्थाने आहेत. लतादीदी या प्रखर राष्ट्रभक्त आहेत. युद्धाच्या काळात जवानांच्या मनोरंजनासाठी व निधी उभारणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामाच्या निधी संकलनासाठी कार्यक्रम, बाबा आमटेंच्या कार्याला सहकार्य, गुजरात भूकंपासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींच्यावेळी आर्थिक मदत अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
पूर्ण जगात मंगेशकर घराण्याचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव दुमदुमत ठेवणार्या या महाराष्ट्रकन्येविषयी जेवढं लिहावं; या मराठी कन्येची थोरवी जितकी गावी, तितकी थोडीच आहे. म्हणून त्यांच्याविषयी एकच म्हणावसे वाटते -
दिव्यात्वाची जेथे प्रचिती। तेथे कर माझे जुळती।।
विष्णू सखाराम खांडेकर
वि. स. खांडेकर
जन्म : ११ जानेवारी, १८९८.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक !
विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.
कुमारवयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला. ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.
एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग (१९३१), दोन ध्रुव (१९३४), हिरवा चाफा, दोन मने (१९३८), रिकामा देव्हारा (१९३९), पहिले प्रेम(१९४०) अशा त्यांच्या अनेक कादंबर्या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या.
शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा-कादंबर्यांतून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे. हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध (१९४२) ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती(१९५९), अमृतवेल (१९६७) या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबर्या होत. ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.
भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले.
‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. वेचलेली फुले (१९४८) या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला.
पंडित भीमसेन जोशी
पंडित भीमसेन जोशी
शास्त्रीय संगीताच्या अवकाशात तेजाने
तळपणारा ‘स्वरभास्कर’असूनही, स्वत: जमिनीवरच राहणारा, आणि रसिकांच्या
अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करणारा तपस्वी कलावंत !
अमृताचे डोही। बुडविले तुम्ही, बुडताना आम्ही। धन्य झालो।।
मी पण संपले। झालो विश्वाकार, स्वरात ओंकार। भेटला गा।।
हे आहेत ‘ज्ञानपीठा’ने ‘भारतरत्ना’बद्दल काढलेले उद्गार, म्हणजेच कविवर्य विंदा करंदीकर यांची पंडित भीमसेनजींवरील प्रतिक्रिया!मी पण संपले। झालो विश्वाकार, स्वरात ओंकार। भेटला गा।।
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात ख्याल गायकीचा राजा म्हणून पंडित भीमसेन जोशींना ओळखले जाते. पंडित भीमसेनजी हे पारंपरिक किराणा घराण्याचे वारसदार आहेत. या घराण्याच्या गायकीचे प्रगल्भ रूप भीमसेनजींच्या गाण्यातून प्रकट होते. भारतीय शास्त्रीय संगीत देशात आणि परदेशात लोकप्रिय करण्यामध्ये भीमसेनजींचे मोलाचे योगदान आहे.
भीमसेनजींचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील गदग या गावी झाला. भीमसेनजींचे संगीतावरील प्रेम इतके विलक्षण होते की, लहानपणी ते सुरांच्या ओढीने मशीदीत जाऊन बसत. तसेच शाळेत जाता-येता तासनतास रेकॉर्डच्या दुकानापाशी उभे राहून गाणी ऐकत व तशीच्या तशी ती गाणी म्हणत. लहानपणापासून संगीताची आवड असणार्या भीमसेनजींनी वयाच्या १२ व्या वर्षी संगीत शिक्षणासाठी घर सोडले. रिकाम्या खिशाने व उपाशी पोटाने त्यांनी मैलोनमैल प्रवास केला. अब्दुल करीम खाँ, वझे बुवा, केसरबाई केरकर यांसारख्या मातब्बर गवयांचे गाणे त्यांनी ऐकले. मिळेल तिथून गायनविद्या ग्रहण केली. अनेक गुरूंचे शिष्यत्व पत्करले व शेवटी रीतसर रामभाऊ कुंदगोळकर(सवाई गंधर्व) यांच्याकडून तालीम घेतली. कुंदगोळ गावी गुरुगृही राहून त्यांनी अतिशय कष्टपूर्वक गायनविद्या संपादन केली. गुरूंच्या मनाप्रमाणे सूर लागत नाही म्हणून एकदा गुरूंनी त्यांना आडकित्ता फेकून मारला होता. या एका प्रसंगावरूनच भीमसेनजींनी केलेल्या परिश्रमांची, रियाजाची कल्पना येते. भीमसेनजींनी ज्या काळात गायनास सुरुवात केली, तो काळ म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीचा. त्या काळात संगीतातील घराणेशाही अधिक घट्ट होत होती. मात्र भीमसेनजींनी -किराणा घराण्याची वैशिष्टये राखत -यापलीकडे जाऊन स्वरसाधना केली आणि भीमसेनजी म्हणजे एक प्रचंड ताकदीचे स्वयंभू व्यासपीठच झाले.
१९४६ साली पुण्यातील हिराबागेत त्यांची पहिली जाहीर बैफील झाली व महाराष्ट्राला भीमसेनी गायकीचे प्रथम दर्शन झाले. त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा भारदस्त, भरदार, गोल, सुरेल असा आवाज. त्यांच्या आवाजाचे मर्मस्थान किंवा त्यांच्या गाण्याचे शक्तिस्थान म्हणजे त्यांचा कानात घुमणारा, रुंजी घालणारा आवाज होय. त्यांच्या आवाजात रस आहे, वजन आहे, स्वर-शब्द पेलण्याची ताकद आहे. त्यांचा आवाज तिन्ही सप्तकांत लीलया फिरतो, तानपुर्याशी चटकन एकजीव होतो. त्यांचं श्वासावर जबरदस्त नियंत्रण आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या शक्तिस्थानांचा गाताना यथायोग्य उपयोग करण्याची प्रतिभाही त्यांच्याकडे आहे. स्वरांचा आनंद स्वतः घेत गाण्याच्या वृत्तीने ते रसिकांना संगीताचा पूरेपूर आनंद देतात. शास्त्रीय गायन, नाट्यगीत, ठुमरी, भजन या अनेक संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा आहे. त्यांची शब्दांची फेक व बंदिशींचे उच्चारण सौंदर्यपूर्ण असते. हिंदी, मराठी, कन्नड या तीनही भाषेतील त्यांचे अभंग लोकप्रिय आहेत. त्यांच्या सुप्रसिध्द अभंगवाणीमुळे अनेक संतपदे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. त्यांचे ‘आता कोठे धावे मन’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘काया ही पंढरी’,‘ तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘ज्ञानियांचा राजा’ हे अभंग ऐकताना साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडतं. अभंगवाणी ही पंडितजींनी महाराष्ट्राला दिलेली भक्तिरसपूर्ण अशी अनमोल देणगी आहे.
त्यांनी देशात, परदेशात शास्त्रीय गायनाच्या अनेक मैफिली गाजवलेल्या आहेत. आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते पुणे येथे दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करतात. गेली ५० हून अधिक वर्षे चालणार्या ह्या संगीत महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी भारतातील तसेच परदेशातीलही असंख्य श्रोते उपस्थिती लावतात. शास्त्रीय गायन व वादन, तसेच नृत्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत या महोत्सवात आपली कला सादर करण्यात धन्यता मानतात.
पुणे विद्यापीठाच्या ललितकला केंद्रात पंडित भीमसेन जोशी अध्यासन स्थापन झाले आहे. पंडितजी गेली पन्नास-साठ वर्षे अखंड संगीताची साधना करीत आहेत. त्यांना अनेक मान-सन्मान लाभले आहेत. संगीताचार्य, पद्मश्री, पद्मभूषण, पुण्यभूषण, स्वरभास्कर, तानसेन यांसारख्या अनेक पुरस्कारांनी व पदव्यांनी ते सन्मानीत आहेत. पुणे व गुलबर्गा विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट दिली, तर टिळक विद्यापीठानेही त्यांना डी.लिट. ही पदवी प्रदान केली आहे. नुकताच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ त्यांना जाहीर झाला आहे. हा बहुमान जाहीर झाल्यानंतर संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केलेला आनंद व त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर , तसेच अवघ्या महाराष्ट्रातील मराठी जनांच्या मनातील आनंदाची लहर अनुभवल्यानंतर पंडित भीमसेन जोशी या गायकाचा ‘उच्च दर्जा’; या कलाकाराची ‘महानता’ आणि या माणसातील ‘माणूसपण’ आपल्या लक्षात येते.
बालगंधर्व
बालगंधर्व
आपले गायन व अभिनय यांच्या साहाय्याने मराठी रंगभूमी व नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुवर्णयुग निर्माण करणारे युगनिर्माते!
नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे नुसते नाव जरी उच्चारले,
तरी मराठी मनाच्या तरफा एकदम झंकारू लागतात. अच्युत बळवंत कोल्हटकर ह्यांनी
महाराष्ट्राच्या दैवतांची नावे घेताना छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य
टिळक यांच्याबरोबर बालगंधर्वांचीही गणना केली आहे. ही तीन नावे जादूच्या
मंत्रासारखी आहेत. पु.ल. देशपांडे म्हणतात, ‘‘बालगंधर्व या नावाचा उच्चार
केला किंवा ते नाव नुसतं कानी पडलं, तरी क्षणार्धातच जादूचं झाड फुलून
यावं, तसं मराठी मन फुलून येतं किंवा जे मन असं फुलून येतं, त्याला मराठी
मन म्हणायला हरकत नाही. बालगंधर्वांसारखा लोकोत्तर कलाकार शंभर वर्षांतून एकदाच जन्माला येतो. या रंगभूमीच्या बादशाहाने सुमारे चार तपे मराठी मनावर राज्य केलं.’’ सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात नागठाणे या गावी जन्मलेल्या बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीची मनोभावे सेवा केली. नाटकांतील नेपथ्य-सजावट, नाट्यसंगीत, नाट्याभिनय या क्षेत्रांत मनापासून उपासना करून स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.
बालगंधर्वांच्या स्त्री भूमिका म्हणजे साक्षात ‘कायाप्रवेशच’. त्यांच्या नजरेत, मुद्रेत, हसण्यात, लाजण्यात, मुरकण्यात, चालण्यात, कपडे नेसण्यात साक्षात स्त्रीचा संचार झालेला आहे असे वाटत असे. ‘पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल,’ असे आचार्य अत्रे यांनी बालगंधर्वांबाबत म्हटले आहे.
मराठी रंगभूमीला पडलेले सुंदर स्वप्न बालगंधर्वांच्या रूपाने सत्यात आले. सहजसुंदर अभिनय आणि केवळ गंधर्वांबरोबरच तुलना होऊ शकेल असा आवाज, म्हणूनच लोकमान्य टिळकांनी छोट्या नारायणाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी दिली. बालगंधर्वांना सुंदर, मोहक आणि बोलका चेहरा लाभला होता. गोड गळ्याची देणगीही त्यांना जन्मजात लाभली होती. शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम होती. भास्करबुवा बखले ह्यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले होते. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.
१९०५ मध्ये त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्यांची शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. स्त्री भूमिका करताना अभिनयक्षमता, अचूक निरीक्षण व सौंदर्यदृष्टी असल्यामुळे स्त्री मनाचे सूक्ष्म भाव सहजपणे प्रकट करण्यात ते यशस्वी झाले. शकुंतला ते सिंधूपर्यंत त्यांच्या स्त्री भूमिकांमध्ये विविधता होती. त्यांच्या वेशभूषा व अलंकारांचे अनुकरण त्या काळातील स्त्रियाही करत असत.
१९१३ मध्ये त्यांनी गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली. या संस्थेने संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला. संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला अशा अनेक संगीत नाटकांनी व त्यातील बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकांनी रसिकांवर त्या काळी मोहिनी घातली होती. या नाटकांच्या प्रयोगांबाबत बालगंधर्वांच्या गीतांना २-३ वेळा वन्समोअर; सातत्याने ‘हाऊस फुल्ल’ होणारे प्रयोग आणि पहाटेपर्यंत चालणारे प्रयोग ह्या गोष्टी नित्याच्याच झाल्या होत्या. त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्याबरोबर केलेला ‘संयुक्त मानापमान’ या नाटकाचा प्रयोगही प्रचंड गाजला. त्यांनी एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. साधारण १९१० ते १९३० हा कालखंड रंगभूमीचा, नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो, तो प्रामुख्याने बालगंधर्वांच्या कर्तृत्वामुळेच.
१९३३ च्या सुमारास बोलपटांचे युग सुरू झाले. साहाजिकच रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. बालगंधर्वांनीही प्रभातच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटात संत एकनाथांची भूमिका केली. बोलपटात त्यांचे मन रमेना. त्यांचा ओढा रंगभूमीकडेच राहिला. १९३९ च्या सुमारास त्यांनी रंगभूमीवर पुरुष भूमिका साकारल्या. पण त्यांच्या स्त्री भूमिकाच प्रेक्षकांना जास्त प्रिय होत्या. १९५५ रोजी त्यांनी ‘एकच प्याला’ नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. ह्या रसिकप्रिय कलावंताचा संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला. पुढे त्यांना पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले गेले. त्याआधी १९२९ सालच्या २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
नाटकांमधील त्यांची अनेक पदे गाजली. शास्त्राचा बाज राखून, अभिनयाला अनुकूल असे गाणे त्यांनी गायले. त्यांची गाणी घरोघरी पोचली. नाट्यसंगीताच्या माध्यमातून बालगंधर्वांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला हातभार लावला. एका अर्थाने त्यांनी शास्त्रीय संगीत सोपे करून रसिकांसमोर मांडले. नाट्यसंगीताची अभिरूची सामान्य रसिकांमध्ये निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालगंधर्वांनी केले. आपल्या हयातीतच आख्यायिका बनून राहिलेल्या या असामान्य कलाकाराची स्मृती रसिकांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने जतन करून ठेवली आहे.
( बालगंधर्वांच्या जीवनावर श्रीमती हेमंती बॅनर्जी यांनी माहितीपट बनवलेला आहे. या माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.)
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर
कुरुंदवाड संस्थानापासून जवळच्याच अंतरावर असणारे दत्ताचे स्थान म्हणजे नरसोबाची वाडी. येथे दत्त जयंतीला तेथील मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात शोभेची दारू उडवीत असत. विष्णुपंत हे दारुकाम पाहत असताना मोठा अपघात झाला व त्यात विष्णुपंतांच्या चेहर्यावर शोभेची दारू उडाली. श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांनी त्यांना मिरजेला औषधोपचारासाठी पाठवले. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. भडभडे विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडून भजने गाऊन घेत असत. डॉ. भडभडे यांना तो आवाज खूप आवडला. इलाज चालू होता मात्र गुण येत नव्हता. दुर्दैवाने विष्णुपंतांना आपले डोळे कायमचे गमवावे लागले. पुढे काय हा प्रश्न पडला असतानाच डॉ. भडभडे यांनी सुचवले की, विष्णुपंतांनी आपल्या आवाजाचा उपयोग करून संगीत शिकावे. ही कल्पना त्यांनी मिरजेचे अधिपती बाळासाहेब पटवर्धन यांच्याकडे मांडली. बाळासाहेब पटवर्धनांनी विष्णुपंतांना आपल्याच दरबारातील राजगवयांकडे संगीत शिक्षण द्यायचे ठरवले. त्यांचे गान विद्येचे शिक्षण मिरजेला १८८७ साली, वयाच्या १५ व्या वर्षी सुरू झाले.
महाराष्ट्रात संगीत क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून ओळखले जाणारे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे मिरजेच्या दरबारी राज गायक होते. विष्णुपंतांनी सलग ९ वर्षे पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने गानविद्या ग्रहण केली. १२-१२ तास रियाज करून उरलेल्या वेळात गुरूंनी सांगीतलेली कामे करणे अशा प्रकारे त्यांनी संगीत शिक्षण घेतले.
विष्णुपंत हे चौकस असल्यामुळे आजुबाजुच्या परिस्थितीचा विचार या काळात करू लागले होते. संगीतकला ही केवळ राजगृहापुरतीच मर्यादित होती. गवई हा राजाश्रीत असल्यामुळे त्याला राजाची मर्जी सांभाळून जीवन जगावे लागत होते. कलाकारांना समाजात प्रतिष्ठा नव्हती. संगीत शिकताना आवश्यक सोयी-सुविधा, विशिष्ट असा अभ्यासक्रम, पुस्तके अशी उपलब्ध नव्हती. आपण केवळ गायक न राहता या सर्व गोष्टींसाठी काम करायचे व संगीतविश्र्वात परिवर्तन घडवायचे असा क्रांतिकारी विचार करून त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविले.
१८९६ साली नारळी पौर्णिमालाच त्यांनी आयुष्यातील ध्येयप्राप्तीसाठी मिरज सोडले. गाठीशी विशेष पैसा नव्हता. तरीही केवळ पोटापाण्याच्या मागे न लागता महत्त्वाकांक्षेने त्यांनी संपूर्ण भारतभर फिरण्यास सुरुवात केली. प्रथम ते काही दिवस सातारा येथे राहिले. नंतर बडोद्याला एका राममंदिरात निवारा घेतला. राजाश्रयाला न जाता स्वतंत्र गाण्याच्या मैफिली करून सर्व जनतेपर्यंत आपली गायकी पोहोचवायची व त्यातून झालेल्या अर्थप्राप्तीतून ध्येयकार्य उभे करायचे, या तत्त्वावरच त्यांनी बडोद्यात जनमानसात आपले स्थान तयार केले. बडोद्याहून ते सौराष्ट्रात गेले. तेथे राजकोट, जुनागढ वगैरे अनेक ठिकाणी त्यांच्या मैफिली झाल्या. यातून ‘सार्वजनिक संगीत जलसा’ ही नवी पद्धत त्यांनी १८९७ साली राजकोट येथून सुरू केली. सर्व इच्छूक रसिकांना प्रवेश शुल्क भरून संगीताचा आस्वाद घेता यावा, केवळ ठरावीक लोकांचीच ती मक्तेदारी असू नये हा त्यामागचा हेतू. या ‘संगीत जलसा’ पद्धतीमुळेच त्यांनी संगीताचे लोकशाहीकरण केले असे म्हटले जाते. ते पुढे ग्वाल्हेरला आले. ग्वाल्हेर हे त्यांच्या गायन परंपरेचे स्थान असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाविषयी विशेष आकर्षण होते. ग्वाल्हेरमध्ये अनेक बड्या मंडळींमध्ये त्यांची उठबस सुरू झाली. त्यांच्या गायनाचा आस्वाद अनेकांना घेता आला. अनेक संगीततज्ज्ञ लोकांकडून त्यांच्या गाण्याची तारीफ झाली. तेथूनच ते पुढे मथुरेस गेले.
मथुरेमध्ये त्यांनी अधिक काळ व्यतीत केला. तेथे राहून त्यांनी केवळ मैफिली केल्या नाहीत, तर शास्त्रीय संगीताच्या चीजांची रचना ज्या ब्रज भाषेतून केली जाते, त्या भाषेचा अभ्यास केला. हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळविले. मथुरेतील प्रसिद्ध ध्रुपद गायक पं. चंदन चोबे यांच्याकडून ध्रुपद गायकीचेही शिक्षण घेतले व काही ध्रुपदांची स्वररचनाही त्यांनी केली. काही प्राचीन ग्रंथांचा अभ्यास त्यांनी इथे केला.
मथुरा, भरतपूर, दिल्ली, जालंधर असा प्रवास करणार्या पंडितजींची कीर्ती उत्तर भारतात पसरली. सर्व ठिकाणी आपल्या गायनाची छाप पाडत त्यांनी बराच लोकसंग्रह केला. त्यांच्या कार्यासाठी हे आवश्यक होते. पंजाबमधील दौरे चालू असताना पंजाबमधील एक प्रतिष्ठीत सर बाबा खेमसिंह वेदी यांनी आपल्या गावी, आपल्या नातवाला संगीत शिकवण्यासाठी पंडितजींना आमंत्रित केले. पंडितजींना जे संगीत शिक्षणाचे कार्य करायचे होते, त्यासाठी काही काळ अभ्यास करायचाच होता. थोडा निवांतपणा या ठिकाणी मिळेल या विचाराने ते पंजाबात गेले.
येथे पलुस्करांनी भारतीय संगीतात स्वरलेखन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बुद्धीच्या, अभ्यासाच्या व प्रतिभेच्या जोरावर त्यांनी उपयुक्त अशी स्वरलेखन पद्धती (नोटेशन) निर्माण केली. मंद्र, मध्य, तार या तीन सप्तकांना वेगळे तीन स्तंभ, कोमल व तीव्र स्वरांसाठी विशिष्ट खुणा, तालनिदर्शक वेगळी चिन्हे, या सर्व गोष्टींसह त्यांनी एक वेगळीच स्वरलेखनपद्धती सुरू केली. स्वरलेखन पद्धती निश्र्चित झाल्यावर गुरूकडून मिळालेल्या अनेक चीजांचे स्वरलेखन त्यांनी केले. ते संगीताचे विद्यालय, त्यासाठीचा विशिष्ट असा अभ्यासक्रम, त्याची पाठ्यपुस्तके या विषयीच्या योजनाही तयार करत होते. पुढे ते लाहोर येथे आले.
लाहोर येथे आल्यावर त्यांनी आपल्या सर्व स्नेह्यांना आपणास संगीताचे विद्यालय उभे करायचे आहे असे सांगितले व सर्वांचा पाठिंबा मिळवला. पं. दीनदयाळ शर्मा यांनी सुचवलेले ‘गांधर्व महाविद्यालय’ हे नाव सर्वांना पसंत पडले. आजतागायत याच नावाने कार्यरत असलेल्या ‘गांधर्व महाविद्यालयाची’ स्थापना लाहोर येथे दिनांक ५ मे, १९०१ रोजी झाली. भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावी अशी ही घटना! ज्या काळात एखादा विषय घेऊन त्याचा अभ्यास करणे, शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम तयार करणे व सर्वांपर्यंत तो पोहोचवणे या गोष्टींचा विचार भारतीय मनात रुजलाही नव्हता त्या काळात त्यांनी हे पुरोगामी कार्य केले. तसेच त्यांनी संगीत क्षेत्रात संस्थीकरण किंवा मंडळीकरणाचेही प्रमुख कार्य केले.
भारतीय संगीताची आवड सर्व स्तरांतील लोकांमध्ये निर्माण व्हावी. राजापासून रंकापर्यंत सर्वांना भारतीय संगीताचे शिक्षण घेता यावे. याचबरोबर संगीताला एक सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले जावे. केवळ मनोरंजन हा याचा उद्देश नसावा. कलाकारांना समाजात मानाचे स्थान मिळावे . या सर्व हेतूंनी त्यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली.
गांधर्व महाविद्यालयाच्या कार्यात ते स्वत: जातीने लक्ष घालत असत. स्वरसाधनेवर पंडितजींचा विशेष भर असे. संगीताचा रियाज, स्वरसाधना या गोष्टी ते विद्यार्थ्यांकडून काटेकोरपणे करून घेत असत. विद्यार्थ्याला केवळ संगीताचे शिक्षण देऊन त्याचा पूर्ण विकास होत नाही, तर तो चारित्र्यवान असला पाहिजे, समाजात त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे या दृष्टीनेही या विद्यालयात विद्यार्थ्यांवर संस्कार केले जात असत. जनमानसात हे केवळ विद्यालय न राहता एक उत्कृष्ट गुरुकुल बनले होते.पंडितजी आपल्या शिष्यांना नेहमी सांगत की, ‘भारतीय संगीताचा सर्वत्र जयजयकार झाला पाहिजे.’
लाहोरमधील या संगीत विद्यालयात क्रमिक पुस्तकांच्या छपाईसाठी एक छापखानाही सुरू करण्यात आला. विद्यालयातर्फे ‘संगीतामृत प्रवाह’ या नावाचे हिंदी मासिकही पंडितजींनी चालवले. या मासिकातून देशभक्तीपर गीते स्वरलिपीसहीत लिहून त्यांचा प्रचार केला जाई.
१९०१ ते १९०८ या कालावधीत लाहोरमधील त्यांचा व्याप वाढला. लाहोरनंतर मुंबई येथे १९०८ च्या दसर्याच्या मुहूर्तावर जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते ‘गांधर्व महाविद्यालयाचे’ उद्घाटन करण्यात आले.
प्रथम गिरगाव बँक मार्गावर (विठ्ठलभाई पटेल रोड) हे संगीत विद्यालय सुरू झाले. पूर्वीचा आठ वर्षांचा अनुभव, शिस्त, पद्धतशीरपणा, शिक्षण देण्याची सुलभ पद्धत या सर्व गुणांमुळे थोड्याच कालावधीत विद्यालयाची ख्याती मुंबईभर पसरली व आहे ती जागा कमी पडू लागली. विद्यार्थ्यांची संख्या इतकी वाढली की क्रमिक पुस्तकांचा छापखाना मुंबईस हालवण्यात आला. वाद्यांच्या दुरुस्तीसाठी पंडितजींनी ‘म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स सप्लाईंग कं.’ सुरू केली. मुंबईमध्येही ‘गांधर्व महाविद्यालय’ या नावाने मराठी मासिक त्यांनी चालू केले. अनेक नवीन क्रमिक पुस्तके प्रसिद्ध केली. इतर अभ्यासक्रमांप्रमाणे संगीत अभ्यासक्रमातही पदवी असावी, पदवीदान समारंभ असावा, व ती पदवी मान्यताप्राप्त व्हावी यासाठी त्यांनी धडपड चालू केली. या त्यांच्या इच्छेचे व धडपडीचे फळ म्हणजे गांधर्व महाविद्यालयाचा पहिला पदवीदान समारंभ १९११ साली मुंबईचे त्या वेळचे गव्हर्नर लॉर्ड सिडनेहॅम यांच्या हस्ते मोठ्या थाटात साजरा झाला. या घटनेमुळे गांधर्व महाविद्यालयाची प्रतिष्ठा अधिकच वाढली. पुढे पंडितजींनी ‘संगीत बाल प्रकाश’ व रागांवरील सुमारे १८ खंड - हे ग्रंथ लिहून प्रकाशित केले.
मुंबईतील कार्याचा व्याप वाढल्यामुळे मुंबई ही गांधर्व महाविद्यालयाची उपशाखा न राहता प्रमुख कार्यालयच झाले. नवी स्वतंत्र इमारत बांधण्यात यश आले. गांधर्व महाविद्यालयाच्या स्वतंत्र, मोठ्या वास्तुत अनेक कार्यक्रम होऊ लागले.
मुंबईतील इमारतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रयत्न कसोशीने करूनही कर्जफेड पूर्ण होत नव्हती. आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. हा मोठा धक्का पंडितजींना सहन झाला नाही. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली. पुढील काळात नाशिकला आल्यावर रामभक्तीकडे त्यांचे लक्ष अधिक वळले. रामायणावरील प्रवचने व कीर्तने यासाठी त्यांचे दौरे मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. त्यांचे अनेक शिष्य भारतभर दूरपर्यंत पोहचले होते. अनेक शाखा भारतभर स्थापन झाल्या होत्या. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराचे कार्य अनेक शिष्यांमार्फत सर्वदूर होत आहे, चारित्र्यवान कलावंत म्हणून त्यांच्या शिष्यांना प्रतिष्ठा मिळत आहे, हे पाहून ते दु:ख विसरले. आपले खरे ध्येय सफल झाले याचा त्यांना परमानंद झाला व प्रभू रामचंद्रानेच हे सर्व करवून घेतले या समाधानात ते पुढील कार्य करत राहिले.
पंडितजींनी संगीताला प्रतिष्ठा मिळवून दिली. स्त्रियांनाही संगीत शिकण्याचा हक्क आहे हे सिद्ध व रूढ करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या पत्नीला संगीत शिकवले. पुढे अनेक स्त्रियांनी गांधर्व महाविद्यालयात संगीताचे शिक्षण घेतले. याचा परिणाम आज आपण पाहतच आहोत. जुन्या बुरसटलेल्या प्रथा मोडून त्यांनी संगीताचे सार्वत्रिकीकरण केले. ‘सार्वजनिक संगीत जलसा’, संगीत परिषद या प्रकारचे नवीन उपक्रम त्यांनी सुरू केले. पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्यासारखे शिष्य त्यांच्या तालमीत घडले. त्यांचे पुत्र डी. व्ही. पलुस्कर हेही त्यांची परंपरा पुढे नेण्याइतपत ‘तयार’ झाले.
‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन त्यांनी अजरामर केले. महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेवेळी पंडितजींनी दिलेल्या चालीवर ‘रघुपती राघव राजाराम’ ही धून गायली गेली व त्या तालावर हजारो लोकांची पावले दांडी यात्रेत पुढे मार्गक्रमण करू लागली. या भजनाप्रमाणेच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला पंडितजींमुळेच लोकप्रियता मिळाली. १९०७ मध्ये लाहोर येथे लाला लजपतराय व अजितसिंग यांना अटक झाल्यावर ‘पगडी सम्हाल ओजट्टा’ व कवी इक्बाल यांचे ‘सारे जहांसे अच्छा’ - या राष्ट्रभक्तीपर गीतांना स्वरबद्ध करून ती लोकप्रिय करण्याचे श्रेयही पंडितजींनाच जाते.
त्यांचे सुरांच्या माध्यमातून व्यक्त होणारे राष्ट्रप्रेम बघून अनेक राष्ट्रीय सभांना ‘वंदे मातरम्’ गाण्यासाठी त्यांना निमंत्रण येत असे. १९२३ साली कॉंग्रेसच्या अधिवेशनात पलुस्करांना निमंत्रित केले होते. त्यांनी अनेक सभा, संमेलने, अधिवेशने यांमध्ये ‘वंदेमातरम्’ प्रभावीपणे सादर करून या ‘राष्ट्रमंत्रा’ चा प्रसार केला, लोकांना प्रेरित केले.
‘कलावंताने देशातील परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे. लोक जरी करमणुकीसाठी आले असले, तरी कलावंताने आपली जबाबदारी ओळखून परिस्थितीशी सुसंगत असे वर्तन केले पाहिजे तरच कलावंताचा दर्जा समाजात वाढेल.’ हा विचार त्यांनी वेळोवेळी मांडला, स्पष्ट केला. अशा प्रकारचे अनेक प्रसंग पंडितजींमधील राष्ट्रभक्ती व सामाजिक जाणीवेचे पुरेपूर दर्शन घडवितात.
हळूहळू पंडितजींची प्रकृती अधिक बिघडत होती. ही बातमी मिरजेचे अधिपती श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांच्या कानावर गेली. श्रीमंतांनी ताबडतोब त्यांना मिरजेला आणले व आपल्या देखरेखीत त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले. परंतु अखेरीस दि. २१ ऑगस्ट, १९३१ रोजी दुपारी दीडच्या सुमारास पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर या क्रांतिकारी संगीततज्ज्ञाची प्राणज्योत मालवली. मिरज येथूनच त्यांनी जीवनकार्यास सुरुवात केली व तेथेच त्यांच्या जीवनाची अखेर झाली. आजची तरूण पिढीही त्यांचे नाव अभिमानाने घेते. काही संगीत क्षेत्रातील कार्यकर्ते आजही गांधर्व महाविद्यालयाची धुरा समर्थपणे वाहत आहेत, आणि या संगीत क्षेत्रातील क्रांतिकारकाची स्मृती चिरंतन ठेवत आहेत.
भारतीय शास्त्रीय संगीताला शास्त्रबद्ध चौकटीत बसविणारे आणि सर्वप्रथम त्याचे दस्तावेजीकरण करणारे श्रेष्ठ संगीततज्ज्ञ!
संगीताचे लोकशाहीकरण करणारे, ‘वंदे मातरम्’
हे राष्ट्रगीत सभेमध्ये म्हणण्याचा प्रघात सुरू करून त्याला सुंदर चाल देऊन
ते अजरामर करणारे, राष्ट्रीय बाण्याचे संगीतातील ‘युगपुरुष’ म्हणजे पंडित
विष्णू दिगंबर पलुस्कर हे होत.
पश्र्चिम महाराष्ट्रातील कुरुंदवाड संस्थानात नारळी पौर्णिमेला विष्णू
दिगंबर पलुस्कर यांचा जन्म झाला. यांचे वडील दिगंबर गोपाळ पलुस्कर हे
कुरुंदवाड संस्थानचे अधिपती श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांच्या आश्रयाला
होते. ते एक उत्तम कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. वडिलांना कीर्तनात साथ
करता करताच लहानपणापासून विष्णू दिगंबर यांच्यावर संगीताचे संस्कार घडत
होते. विष्णू पलुस्कर यांचा आवाज गोड व मोठा असल्यामुळे साध्या गाण्यानेही
त्यांची छाप श्रोत्यांवर पडत असे. श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांचा लोभ
पहिल्यापासूनच विष्णुवर होता. त्यांच्या आशीर्वादानेच त्यांचे इंग्रजी
सहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढील आयुष्य हे आपल्या वडिलांप्रमाणेच कीर्तने
करून, संस्थानात एखादी नोकरी करून जीवन व्यतीत करावे असा त्यांचा विचार
होता. मात्र नियतीला काही वेगळेच घडवायचे होते. कुरुंदवाड संस्थानापासून जवळच्याच अंतरावर असणारे दत्ताचे स्थान म्हणजे नरसोबाची वाडी. येथे दत्त जयंतीला तेथील मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात शोभेची दारू उडवीत असत. विष्णुपंत हे दारुकाम पाहत असताना मोठा अपघात झाला व त्यात विष्णुपंतांच्या चेहर्यावर शोभेची दारू उडाली. श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांनी त्यांना मिरजेला औषधोपचारासाठी पाठवले. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. भडभडे विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडून भजने गाऊन घेत असत. डॉ. भडभडे यांना तो आवाज खूप आवडला. इलाज चालू होता मात्र गुण येत नव्हता. दुर्दैवाने विष्णुपंतांना आपले डोळे कायमचे गमवावे लागले. पुढे काय हा प्रश्न पडला असतानाच डॉ. भडभडे यांनी सुचवले की, विष्णुपंतांनी आपल्या आवाजाचा उपयोग करून संगीत शिकावे. ही कल्पना त्यांनी मिरजेचे अधिपती बाळासाहेब पटवर्धन यांच्याकडे मांडली. बाळासाहेब पटवर्धनांनी विष्णुपंतांना आपल्याच दरबारातील राजगवयांकडे संगीत शिक्षण द्यायचे ठरवले. त्यांचे गान विद्येचे शिक्षण मिरजेला १८८७ साली, वयाच्या १५ व्या वर्षी सुरू झाले.
महाराष्ट्रात संगीत क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून ओळखले जाणारे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे मिरजेच्या दरबारी राज गायक होते. विष्णुपंतांनी सलग ९ वर्षे पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने गानविद्या ग्रहण केली. १२-१२ तास रियाज करून उरलेल्या वेळात गुरूंनी सांगीतलेली कामे करणे अशा प्रकारे त्यांनी संगीत शिक्षण घेतले.
विष्णुपंत हे चौकस असल्यामुळे आजुबाजुच्या परिस्थितीचा विचार या काळात करू लागले होते. संगीतकला ही केवळ राजगृहापुरतीच मर्यादित होती. गवई हा राजाश्रीत असल्यामुळे त्याला राजाची मर्जी सांभाळून जीवन जगावे लागत होते. कलाकारांना समाजात प्रतिष्ठा नव्हती. संगीत शिकताना आवश्यक सोयी-सुविधा, विशिष्ट असा अभ्यासक्रम, पुस्तके अशी उपलब्ध नव्हती. आपण केवळ गायक न राहता या सर्व गोष्टींसाठी काम करायचे व संगीतविश्र्वात परिवर्तन घडवायचे असा क्रांतिकारी विचार करून त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविले.
१८९६ साली नारळी पौर्णिमालाच त्यांनी आयुष्यातील ध्येयप्राप्तीसाठी मिरज सोडले. गाठीशी विशेष पैसा नव्हता. तरीही केवळ पोटापाण्याच्या मागे न लागता महत्त्वाकांक्षेने त्यांनी संपूर्ण भारतभर फिरण्यास सुरुवात केली. प्रथम ते काही दिवस सातारा येथे राहिले. नंतर बडोद्याला एका राममंदिरात निवारा घेतला. राजाश्रयाला न जाता स्वतंत्र गाण्याच्या मैफिली करून सर्व जनतेपर्यंत आपली गायकी पोहोचवायची व त्यातून झालेल्या अर्थप्राप्तीतून ध्येयकार्य उभे करायचे, या तत्त्वावरच त्यांनी बडोद्यात जनमानसात आपले स्थान तयार केले. बडोद्याहून ते सौराष्ट्रात गेले. तेथे राजकोट, जुनागढ वगैरे अनेक ठिकाणी त्यांच्या मैफिली झाल्या. यातून ‘सार्वजनिक संगीत जलसा’ ही नवी पद्धत त्यांनी १८९७ साली राजकोट येथून सुरू केली. सर्व इच्छूक रसिकांना प्रवेश शुल्क भरून संगीताचा आस्वाद घेता यावा, केवळ ठरावीक लोकांचीच ती मक्तेदारी असू नये हा त्यामागचा हेतू. या ‘संगीत जलसा’ पद्धतीमुळेच त्यांनी संगीताचे लोकशाहीकरण केले असे म्हटले जाते. ते पुढे ग्वाल्हेरला आले. ग्वाल्हेर हे त्यांच्या गायन परंपरेचे स्थान असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाविषयी विशेष आकर्षण होते. ग्वाल्हेरमध्ये अनेक बड्या मंडळींमध्ये त्यांची उठबस सुरू झाली. त्यांच्या गायनाचा आस्वाद अनेकांना घेता आला. अनेक संगीततज्ज्ञ लोकांकडून त्यांच्या गाण्याची तारीफ झाली. तेथूनच ते पुढे मथुरेस गेले.
मथुरेमध्ये त्यांनी अधिक काळ व्यतीत केला. तेथे राहून त्यांनी केवळ मैफिली केल्या नाहीत, तर शास्त्रीय संगीताच्या चीजांची रचना ज्या ब्रज भाषेतून केली जाते, त्या भाषेचा अभ्यास केला. हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळविले. मथुरेतील प्रसिद्ध ध्रुपद गायक पं. चंदन चोबे यांच्याकडून ध्रुपद गायकीचेही शिक्षण घेतले व काही ध्रुपदांची स्वररचनाही त्यांनी केली. काही प्राचीन ग्रंथांचा अभ्यास त्यांनी इथे केला.
मथुरा, भरतपूर, दिल्ली, जालंधर असा प्रवास करणार्या पंडितजींची कीर्ती उत्तर भारतात पसरली. सर्व ठिकाणी आपल्या गायनाची छाप पाडत त्यांनी बराच लोकसंग्रह केला. त्यांच्या कार्यासाठी हे आवश्यक होते. पंजाबमधील दौरे चालू असताना पंजाबमधील एक प्रतिष्ठीत सर बाबा खेमसिंह वेदी यांनी आपल्या गावी, आपल्या नातवाला संगीत शिकवण्यासाठी पंडितजींना आमंत्रित केले. पंडितजींना जे संगीत शिक्षणाचे कार्य करायचे होते, त्यासाठी काही काळ अभ्यास करायचाच होता. थोडा निवांतपणा या ठिकाणी मिळेल या विचाराने ते पंजाबात गेले.
येथे पलुस्करांनी भारतीय संगीतात स्वरलेखन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बुद्धीच्या, अभ्यासाच्या व प्रतिभेच्या जोरावर त्यांनी उपयुक्त अशी स्वरलेखन पद्धती (नोटेशन) निर्माण केली. मंद्र, मध्य, तार या तीन सप्तकांना वेगळे तीन स्तंभ, कोमल व तीव्र स्वरांसाठी विशिष्ट खुणा, तालनिदर्शक वेगळी चिन्हे, या सर्व गोष्टींसह त्यांनी एक वेगळीच स्वरलेखनपद्धती सुरू केली. स्वरलेखन पद्धती निश्र्चित झाल्यावर गुरूकडून मिळालेल्या अनेक चीजांचे स्वरलेखन त्यांनी केले. ते संगीताचे विद्यालय, त्यासाठीचा विशिष्ट असा अभ्यासक्रम, त्याची पाठ्यपुस्तके या विषयीच्या योजनाही तयार करत होते. पुढे ते लाहोर येथे आले.
लाहोर येथे आल्यावर त्यांनी आपल्या सर्व स्नेह्यांना आपणास संगीताचे विद्यालय उभे करायचे आहे असे सांगितले व सर्वांचा पाठिंबा मिळवला. पं. दीनदयाळ शर्मा यांनी सुचवलेले ‘गांधर्व महाविद्यालय’ हे नाव सर्वांना पसंत पडले. आजतागायत याच नावाने कार्यरत असलेल्या ‘गांधर्व महाविद्यालयाची’ स्थापना लाहोर येथे दिनांक ५ मे, १९०१ रोजी झाली. भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावी अशी ही घटना! ज्या काळात एखादा विषय घेऊन त्याचा अभ्यास करणे, शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम तयार करणे व सर्वांपर्यंत तो पोहोचवणे या गोष्टींचा विचार भारतीय मनात रुजलाही नव्हता त्या काळात त्यांनी हे पुरोगामी कार्य केले. तसेच त्यांनी संगीत क्षेत्रात संस्थीकरण किंवा मंडळीकरणाचेही प्रमुख कार्य केले.
भारतीय संगीताची आवड सर्व स्तरांतील लोकांमध्ये निर्माण व्हावी. राजापासून रंकापर्यंत सर्वांना भारतीय संगीताचे शिक्षण घेता यावे. याचबरोबर संगीताला एक सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले जावे. केवळ मनोरंजन हा याचा उद्देश नसावा. कलाकारांना समाजात मानाचे स्थान मिळावे . या सर्व हेतूंनी त्यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली.
गांधर्व महाविद्यालयाच्या कार्यात ते स्वत: जातीने लक्ष घालत असत. स्वरसाधनेवर पंडितजींचा विशेष भर असे. संगीताचा रियाज, स्वरसाधना या गोष्टी ते विद्यार्थ्यांकडून काटेकोरपणे करून घेत असत. विद्यार्थ्याला केवळ संगीताचे शिक्षण देऊन त्याचा पूर्ण विकास होत नाही, तर तो चारित्र्यवान असला पाहिजे, समाजात त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे या दृष्टीनेही या विद्यालयात विद्यार्थ्यांवर संस्कार केले जात असत. जनमानसात हे केवळ विद्यालय न राहता एक उत्कृष्ट गुरुकुल बनले होते.पंडितजी आपल्या शिष्यांना नेहमी सांगत की, ‘भारतीय संगीताचा सर्वत्र जयजयकार झाला पाहिजे.’
लाहोरमधील या संगीत विद्यालयात क्रमिक पुस्तकांच्या छपाईसाठी एक छापखानाही सुरू करण्यात आला. विद्यालयातर्फे ‘संगीतामृत प्रवाह’ या नावाचे हिंदी मासिकही पंडितजींनी चालवले. या मासिकातून देशभक्तीपर गीते स्वरलिपीसहीत लिहून त्यांचा प्रचार केला जाई.
१९०१ ते १९०८ या कालावधीत लाहोरमधील त्यांचा व्याप वाढला. लाहोरनंतर मुंबई येथे १९०८ च्या दसर्याच्या मुहूर्तावर जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते ‘गांधर्व महाविद्यालयाचे’ उद्घाटन करण्यात आले.
प्रथम गिरगाव बँक मार्गावर (विठ्ठलभाई पटेल रोड) हे संगीत विद्यालय सुरू झाले. पूर्वीचा आठ वर्षांचा अनुभव, शिस्त, पद्धतशीरपणा, शिक्षण देण्याची सुलभ पद्धत या सर्व गुणांमुळे थोड्याच कालावधीत विद्यालयाची ख्याती मुंबईभर पसरली व आहे ती जागा कमी पडू लागली. विद्यार्थ्यांची संख्या इतकी वाढली की क्रमिक पुस्तकांचा छापखाना मुंबईस हालवण्यात आला. वाद्यांच्या दुरुस्तीसाठी पंडितजींनी ‘म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स सप्लाईंग कं.’ सुरू केली. मुंबईमध्येही ‘गांधर्व महाविद्यालय’ या नावाने मराठी मासिक त्यांनी चालू केले. अनेक नवीन क्रमिक पुस्तके प्रसिद्ध केली. इतर अभ्यासक्रमांप्रमाणे संगीत अभ्यासक्रमातही पदवी असावी, पदवीदान समारंभ असावा, व ती पदवी मान्यताप्राप्त व्हावी यासाठी त्यांनी धडपड चालू केली. या त्यांच्या इच्छेचे व धडपडीचे फळ म्हणजे गांधर्व महाविद्यालयाचा पहिला पदवीदान समारंभ १९११ साली मुंबईचे त्या वेळचे गव्हर्नर लॉर्ड सिडनेहॅम यांच्या हस्ते मोठ्या थाटात साजरा झाला. या घटनेमुळे गांधर्व महाविद्यालयाची प्रतिष्ठा अधिकच वाढली. पुढे पंडितजींनी ‘संगीत बाल प्रकाश’ व रागांवरील सुमारे १८ खंड - हे ग्रंथ लिहून प्रकाशित केले.
मुंबईतील कार्याचा व्याप वाढल्यामुळे मुंबई ही गांधर्व महाविद्यालयाची उपशाखा न राहता प्रमुख कार्यालयच झाले. नवी स्वतंत्र इमारत बांधण्यात यश आले. गांधर्व महाविद्यालयाच्या स्वतंत्र, मोठ्या वास्तुत अनेक कार्यक्रम होऊ लागले.
मुंबईतील इमारतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रयत्न कसोशीने करूनही कर्जफेड पूर्ण होत नव्हती. आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. हा मोठा धक्का पंडितजींना सहन झाला नाही. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली. पुढील काळात नाशिकला आल्यावर रामभक्तीकडे त्यांचे लक्ष अधिक वळले. रामायणावरील प्रवचने व कीर्तने यासाठी त्यांचे दौरे मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. त्यांचे अनेक शिष्य भारतभर दूरपर्यंत पोहचले होते. अनेक शाखा भारतभर स्थापन झाल्या होत्या. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराचे कार्य अनेक शिष्यांमार्फत सर्वदूर होत आहे, चारित्र्यवान कलावंत म्हणून त्यांच्या शिष्यांना प्रतिष्ठा मिळत आहे, हे पाहून ते दु:ख विसरले. आपले खरे ध्येय सफल झाले याचा त्यांना परमानंद झाला व प्रभू रामचंद्रानेच हे सर्व करवून घेतले या समाधानात ते पुढील कार्य करत राहिले.
पंडितजींनी संगीताला प्रतिष्ठा मिळवून दिली. स्त्रियांनाही संगीत शिकण्याचा हक्क आहे हे सिद्ध व रूढ करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या पत्नीला संगीत शिकवले. पुढे अनेक स्त्रियांनी गांधर्व महाविद्यालयात संगीताचे शिक्षण घेतले. याचा परिणाम आज आपण पाहतच आहोत. जुन्या बुरसटलेल्या प्रथा मोडून त्यांनी संगीताचे सार्वत्रिकीकरण केले. ‘सार्वजनिक संगीत जलसा’, संगीत परिषद या प्रकारचे नवीन उपक्रम त्यांनी सुरू केले. पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्यासारखे शिष्य त्यांच्या तालमीत घडले. त्यांचे पुत्र डी. व्ही. पलुस्कर हेही त्यांची परंपरा पुढे नेण्याइतपत ‘तयार’ झाले.
‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन त्यांनी अजरामर केले. महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेवेळी पंडितजींनी दिलेल्या चालीवर ‘रघुपती राघव राजाराम’ ही धून गायली गेली व त्या तालावर हजारो लोकांची पावले दांडी यात्रेत पुढे मार्गक्रमण करू लागली. या भजनाप्रमाणेच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला पंडितजींमुळेच लोकप्रियता मिळाली. १९०७ मध्ये लाहोर येथे लाला लजपतराय व अजितसिंग यांना अटक झाल्यावर ‘पगडी सम्हाल ओजट्टा’ व कवी इक्बाल यांचे ‘सारे जहांसे अच्छा’ - या राष्ट्रभक्तीपर गीतांना स्वरबद्ध करून ती लोकप्रिय करण्याचे श्रेयही पंडितजींनाच जाते.
त्यांचे सुरांच्या माध्यमातून व्यक्त होणारे राष्ट्रप्रेम बघून अनेक राष्ट्रीय सभांना ‘वंदे मातरम्’ गाण्यासाठी त्यांना निमंत्रण येत असे. १९२३ साली कॉंग्रेसच्या अधिवेशनात पलुस्करांना निमंत्रित केले होते. त्यांनी अनेक सभा, संमेलने, अधिवेशने यांमध्ये ‘वंदेमातरम्’ प्रभावीपणे सादर करून या ‘राष्ट्रमंत्रा’ चा प्रसार केला, लोकांना प्रेरित केले.
‘कलावंताने देशातील परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे. लोक जरी करमणुकीसाठी आले असले, तरी कलावंताने आपली जबाबदारी ओळखून परिस्थितीशी सुसंगत असे वर्तन केले पाहिजे तरच कलावंताचा दर्जा समाजात वाढेल.’ हा विचार त्यांनी वेळोवेळी मांडला, स्पष्ट केला. अशा प्रकारचे अनेक प्रसंग पंडितजींमधील राष्ट्रभक्ती व सामाजिक जाणीवेचे पुरेपूर दर्शन घडवितात.
हळूहळू पंडितजींची प्रकृती अधिक बिघडत होती. ही बातमी मिरजेचे अधिपती श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांच्या कानावर गेली. श्रीमंतांनी ताबडतोब त्यांना मिरजेला आणले व आपल्या देखरेखीत त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले. परंतु अखेरीस दि. २१ ऑगस्ट, १९३१ रोजी दुपारी दीडच्या सुमारास पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर या क्रांतिकारी संगीततज्ज्ञाची प्राणज्योत मालवली. मिरज येथूनच त्यांनी जीवनकार्यास सुरुवात केली व तेथेच त्यांच्या जीवनाची अखेर झाली. आजची तरूण पिढीही त्यांचे नाव अभिमानाने घेते. काही संगीत क्षेत्रातील कार्यकर्ते आजही गांधर्व महाविद्यालयाची धुरा समर्थपणे वाहत आहेत, आणि या संगीत क्षेत्रातील क्रांतिकारकाची स्मृती चिरंतन ठेवत आहेत.
दादासाहेब फाळके
दादासाहेब फाळके
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक.
जागतिक चित्रपट निर्मितीच्या इतिहासात डेव्हिड वॉर्क ग्रींफिथ यांचे जे
स्थान आहे, तेच स्थान भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात धुंडिराज गोविंद
उर्फ दादासाहेब फाळके यांचे आहे. चित्रपट तंत्र, वितरण, मूव्ही कॅमेरा हे
शब्दही माहिती नसतानाच्या काळात दादासाहेब फाळके ह्यांनी एकहाती प्रयत्न
करून पहिल्या भारतीय चित्रपटाची निर्मिती केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपटतंत्र आत्मसात करून त्यांनी भारतात चित्रपट निर्मितीचा पाया घातला आणि म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतात. दादासाहेब फाळके ह्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. १८८५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्याच जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् येथे प्रवेश घेतला. याच सुमारास त्यांना फोटोग्राफी, प्रोसेस फोटोग्राफी यांसारख्या गोष्टींचा छंद लागला. काही काळ त्यांनी बडोदा येथील कलाभवनात शिक्षण घेतले. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनामुळे त्यांनी शिल्पकला, चित्रकला, थ्री कलर प्रोसेसिंग व छायाचित्रण इत्यादी क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग केले. (याशिवाय दादासाहेबांनी जादूविद्या शिकून निरनिराळ्या ठिकाणी जादूचे प्रयोगही सादर केले.)
१९१० च्या सुमारास दादासाहेब फाळके ह्यांनी ‘दी लाइफ ऑंफ ख्राईस्ट’ हा चित्रपट पाहिला, आणि त्यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यासच घेतला.मित्रमंडळींच्या मदतीने कर्ज उभारून १९१२ साली ते इंग्लंडला चित्रपटतंत्र शिकण्यासाठी गेले. तेथे त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्री मिळवली. भारतात परतल्यावर राहत्या घरातच त्यांनी स्टुडिओ उभारला.
१९१२ मध्येच दादासाहेब फाळके यांनी ‘रोपट्यांची वाढ’ हा लघुपट तयार केला. त्यानंतर ते मोठ्या चित्रपटांच्या निर्मितीकडे वळले. द. दा. दाबके व भालचंद्र फाळके यांना प्रमुख भूमिकांसाठी घेऊन दादासाहेबांनी अत्यंत परिश्रमपूर्वक स्वदेशी चित्रपटाची निर्मिती केली. ३ मे, १९१३ रोजी दादासाहेबांचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ मुंबईत (कोरोनेशन सिनेमा येथे) प्रदर्शित झाला. हाच भारतातील पहिला चित्रपट (मूकपट) होय. हा चित्रपट सुमारे ४० मिनिटांचा होता. आपल्या ह्या पहिल्याच चित्रपटात लेखक, रंगवेशभूषाकार, संकलक, कलादिग्दर्शक अशा विविध भूमिका दादासाहेबांनी एकट्यानेच पार पाडल्या. या चित्रपटात हिंदी व इंग्रजी सबटायटल्सची योजना करण्यात आली होती. त्या काळात ते स्वतः एक पडदा व प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात आणि आपल्या चित्रपटाचे खेळ प्रेक्षकांना दाखवीत. त्यांचा हा पहिला चित्रपट खूप लोकप्रिय झाला. युरोपातील संबंधित संस्थाही हा चित्रपट पाहून प्रभावित झाल्या. अनेक परदेशी संस्थांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले. पण दादासाहेबांनी ही निमंत्रणे नाकारली, भारतातच राहणे पसंत केले.
आपल्या पहिल्या चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर फाळके यांनी मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री, कालिया मर्दन, गंगावतारम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली.१ जानेवारी, १९१८ रोजी त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ स्थापन केली. या कंपनीने तयार केलेले व फाळके ह्यांनी दिग्दर्शित केलेले लंकादहन, श्रीकृष्णजन्म हे चित्रपट विशेष गाजले. लंकादहन हा भारतातील पहिला ‘बॉक्स ऑफिस हिट’ चित्रपट मानला जातो. लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट त्यांनीच सर्वप्रथम भारतात तयार केले. दादासाहेबांनी एकूण सुमारे १०० चित्रपटांची निर्मिती केली. तसेच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे, शिक्षण आदी विषयांवरील २५ लघुपट त्यांनी निर्माण केले.
पैसा, मनुष्यबळ सर्वांचाच अभाव असताना अत्यंत निष्ठेने व जिद्दीने दृक्श्राव्य माध्यमाची मुहूर्तमेढ रोवताना दादासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इतिहास घडवला. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, कलात्मक दृष्टीकोन आणि कष्टाळूपणा या भांडवलावर त्यांनी शून्यातून चित्रपट निर्मितीचा पाया घातला. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून भारतभर चित्रपट निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले.
दादासाहेब फाळके यांच्या योगदानामुळे सन १९७० पासून म्हणजेच दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षापासून केंद्र शासनाने ‘दादासाहेब फाळके’ हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणार्या कलावंतांच्या बहुमानासाठी सुरू केला.
चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पायाभूत कार्य करणारे, तसेच महाराष्ट्रात पहिला चित्रपट बनवणारे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके प्रत्येक मराठी
माणसाच्या मनातील अभिमानाचा बिंदू आहेत हे निश्र्चित!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)